
कोपरगाव प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात उत्साहात साजरा होत आहे. गिरमेवस्ती शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी भारतमाता की जय,वंदे मातरम ,स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, हर घर तिरंगा अशा घोषणा देत परिसर देशभक्तीमय केला .यानंतर ध्वजाचे ध्वजारोहण संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण ,शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष बाळासाहेब सोळके ,माजी सरपंच राजेंद्र गिरमे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड व मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सरपंच राजेंद्र गिरमे होते.विद्यार्थ्यांनी मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेत स्वातंत्र्यदिनाविषयी भाषणे केली. समूहगीत व वैयक्तिक गीत गायनातून विद्यार्थ्यांनी देशभक्ती दाखवली. विद्यार्थ्यांनी खडे व बैठे कवायत प्रकार तालबद्ध रीतीने करून दाखवले .
बाळासाहेब वक्ते यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव विषयी व घरोघरी तिरंगा याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. जालिंदर चव्हाण यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रदीप गायकवाड यांनी भारतीय विविधतेतील एकता,बंधुता याविषयी माहिती सांगितली .यावेळी महारुद्र फाउंडेशन च्या वतीने शाळेला डिजिटल स्पीकर भेट देण्यात आला.शाळेतील उपशिक्षक सुदाम साळुंके यांनी तयार केलेल्या प्रश्नमंजुषा पुस्तिकेचे व विद्यार्थी हस्त पुस्तिकेचे प्रकाशन तसेच प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.सुदाम साळुंके यांनी शाळेला सॉफ्टवेअर भेट दिले.उपशिक्षक अनुज ढुमणे यांनी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या वाचन लेखन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी बाळासाहेब वक्ते, जालिंदर चव्हाण ,बाळासाहेब सोळके प्रदीप गायकवाड,राजेंद्रजी गिरमे, महारुद्र फाउंडेशन चे अध्यक्ष शशिकांत वक्ते, अमोल राऊत ,विलास राऊत, शिवसूत्र युवा प्रतिष्ठानचे सदस्य, आरोग्य कर्मचारी ,अंगणवाडी सेविका व मदतनीस,शा पो आ कर्मचारी, ग्रामस्थ व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच
विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाची सुत्रसंचालन अनुज ढुमणे यांनी केले सुदाम साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले व आभार मुख्याध्यापिका श्रीमती प्रियंका जोशी यांनी मानले .


