
कोपरगाव प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात उत्साहात साजरा होत आहे. हॅरिसन ब्रँच शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी भारतमाता की जय,वंदे मातरम ,स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, हर घर तिरंगा अशा घोषणा देत परिसर देशभक्तीमय केला.यानंतर ध्वजाचे ध्वजारोहण शिक्षण प्रेमी चांगदेव वक्ते सर,संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतिश आव्हाड,माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण,
ग्रामपंचायत सदस्य यशवंत आव्हाड, प्रदीप गायकवाड, शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष संदिप पवार व मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सेवानिवृत्त शिक्षक चांगदेव वक्ते सर होते.विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाविषयी भाषणे केली. विविध थोर क्रांतिकारक व नेत्यांच्या वेशभूषेतून विद्यार्थ्यांनी देशभक्ती दाखवली.
नवनाथ सूर्यवंशी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव विषयी व घरोघरी तिरंगा याविषयी आपले मनोगत प्रस्ताविकातून व्यक्त केले.सतिश आव्हाड,जालिंदर चव्हाण, प्रदीप गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून सर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणात चांगदेव वक्ते यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्व व थोर नेत्यांच्या बलिदानाची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका व मदतनीस,शा पो आ कर्मचारी, ग्रामस्थ व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दूध डेअरी हॅरिसन ब्रँच व पालकांतर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाची सुत्रसंचालन नवनाथ सूर्यवंशी यांनी केले व आभार श्रीमती मनिषा शिंपी यांनी मानले .


