
कोपरगाव प्रतिनिधी
शिक्षक बँकेची निवडणूक जवळ आली की, प्रत्येक मंडळ आपली बाजू कशी स्वच्छ आहे हे पटवून देण्यासाठी धडपडत असतो.पण; आत्ताचा सामान्य शिक्षक सभासद हा जागृत आहे.
प्रत्येकाला आपलं हित कशात आहे याची जाण आहे.सत्तेत नसतानाही गुरुकुल मंडळाने कोणकोणती कामे केलीत याची माहिती प्रत्येक सामान्य शिक्षक सभासदांना आहे.पण; काही लोकं ज्या मंडळाच्या जीवावर प्रकाशझोतात आलेत आज तेच सांगत सुटलेत की ,गुरुकुल मंडळ आज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालेली आहे म्हणून.किती हा कृतघ्नपणा .अशा व्यक्तींना मंडळाशी काहीही घेणं-देणं नसते;त्यांना फक्त आपला स्वार्थ कसा साध्य करता येईल एवढाच एकमेव विचार असतो. असं म्हटलं तर वावगं होणार नाही.
अवघ्या जिल्ह्याला गुरुकुल मंडळाने केलेल्या कामाबद्दल सांगण्याची गरज नाही. त्यामुळे कुठलाही सर्वसामान्य सभासद कुठल्याही प्रकारचा प्रश्न करीत नाहीत किंवा त्यांच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची नाराजी नाही. काही स्वतःला निष्ठावान म्हणवून घेतात आणि साधं तिकीट मिळालं नाही म्हणून मंडळाला सोडून जातात. याला कुठल्या प्रकारची निष्ठा म्हणायची की निष्टानिष्टी म्हणायचं हाच मोठा प्रश्न आजच्या सामान्य शिक्षकांपुढे आहे.तसेच गुरुकुल मंडळातील वडीलधारे व जुन्याजाणत्या कार्यकर्त्या मंडळींनी जी तरुण मंडळींना लढण्याची प्रेरणा दिलेली आहे;त्यावरून असे वाटत नाही की त्यांचा आणि प्रचाराचा काहीही संबंध नाही म्हणून. कारण जे खरे निष्ठावान असतात ते तिकीट मिळाले नाही म्हणून साथ सोडत नसतात. ते नेहमीच सोबत करत असतात.
आज संपूर्ण कोपरगावात प्रचाराचा दौरा सुरू असताना असे लक्षात आले की सामान्य शिक्षक बांधवांमध्ये गुरुकुल बद्दल प्रचंड निष्ठा आणि उत्साह आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक तालुक्यातील उमेदवार व जिल्हा कार्यकर्ते यांची ओळख सामान्य सभासदांना व्हावी म्हणून जिल्ह्याच्या चहू दिशांना सामान्य कार्यकर्ते , उमेदवार तसेच जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रचाराच्या निमित्ताने फिरत आहेत.उद्देश एवढाच आहे की, एक चांगलं मंडळ सत्तेत यावं आणि सामान्य शिक्षक सभासदांना परवडणारा बँकेचा व्यवहार त्यांच्या करवी चालावा. एकंदर शिक्षक मतदारांचा उत्साह व गुरुकुल मंडळाप्रती असणारी आस्था बघता विजयश्री निश्चितच आपलाच होणार आहे असा विश्वास श्रीकांत साळवे गुरुकुल Dcps / Nps अध्यक्ष कोपरगाव यांनी व्यक्त.


