
कोपरगाव प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने देशभरात अमृत महोत्सव साजरा होत आहे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान राबविण्यात यावे असे आवाहन करण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातील
जेऊर कुंभारी गावातील महारुद्रा फाऊंडेशने अतिशय उत्कृष्ट रितीने समाजातील तळागाळातील लोकापर्यंत जाऊन जनजागृती करून ध्वोज कसा फडकावा या विषयी मार्गदर्शन केले या महारुद्रा फाऊंडेशने देशा विषय असलेले प्रेम व्यक्त केले
तसेच तरूणांनी या संघटनेचा आदर्श घेवून देशसेवेसाठी पुढे यावे असे प्रतिपादन महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे माजी संचालक मधुकर वक्ते यांनी केले.
विशेष म्हणजे या फाऊंडेशन ने जेऊर कुंभारी गावाप्रमाणे माहेगाव देशमुख, कोकमठाण, कोपरगाव शहरातील व्यापारी वर्ग, सरकारी कार्यालयातही मोफत ध्वज वाटण्यात आले असे सांगण्यात आले.


