
कोपरगाव प्रतिनिधी
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने आजादी गौरव पदयात्रा देशभर काढण्यात येत आहे. रविवार दि. १४ ऑगस्ट २०२२ रोजी कोपरगाव तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुक्यात पदयात्रा काढून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यतील काँग्रेस पक्षाच्या संघर्ष आणि योगदानाबद्दल जनजागृती करण्यात आली.
कोपरगाव काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी नगर-मनमाड हायवे लगत जेऊर कुंभारी ते पुणतांबा चौफुली घोषणा देत पदयात्रा काढली. पुणतांबा चौफुली येथे समारोप प्रसंगी आकाश नागरे यांनी आपले विचार मांडत स्वातंत्र्यलढ्यातील महापुरुषांना अभिवादन केले आणि भारतीय संविधानाच्या सामाजिक एकता, सर्वधर्म समभाव आणि लोकशाहीच्या मूलभूत विचारांना पुढे घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष आहे असे सांगितले. देशाचे नेते खा. राहुलजी गांधी आणि विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष नवीन उभारी घेऊन लोकशाही मार्गाने देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कोपरगाव तालुका अध्यक्ष आकाशभाऊ नागरे, उपाध्यक्ष रवींद्र साबळे, जिल्हा सरचिटणीस प्रशांत आहिरे, छोटुभाई पठाण, शब्बीरभाई शेख, यादवराव त्रिभुवन, युसूफ भाई शेख, गणेश निळे, रायभान पगारे, सुरेश पगारे, रवी माळी, मयूर सोनवणे, पंकज बर्डे, विशाल मोरे, विक्रम बेडकुळे, सुनील जाधव , साहिल पिंपळे, प्रविन भवर, शुभम बर्डे, जालिंदर पवार,अविनाश पवार, सुदेश माळी, किशोर पवार, रमेश माळी, अमित पवार आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


