
कोपरगाव प्रतिनिधी
भारताला असंख्य स्वातंत्र्यवीरांचा त्याग आणि बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य मोलाचे आहे. स्वातंत्र्याचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदाचे पुरस्कर्ते होवून स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करु या ! . ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’निमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभिमानाने फडकविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करावा असे
आवाहन महारुद्रा फाऊंडेशन च्या वतीने करण्यात येत आहे.
भारत सरकारचे वतीने ‘भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी’ वर्षानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचे माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान प्रत्येक भारतीयाने आपल्या घरावर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा अभिमानाने फडकविण्याचे आवाहन भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
वरील अभियानाची जनजागृती करत आज दिनांक १०.०८.२०२२ पासून महारुद्रा फाऊंडेशन (हेल्पिंग हॅण्डस् ) – जेऊर कुंभारी तर्फे “हर घर तिरंगा” अभियान ला प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली. आज हि सुरुवात महारुद्रा फाऊंडेशन चे कोषागार किरण देशमुख (CA) यांनी विक्रीकर विभाग, अहमदनगर येथील अधिकाऱ्यांना NATIONAL FLAG BEDGES देऊन या अभियानाला प्रत्यक्षात सुरूवात केली. आपल्या महारुद्रा फाऊंडेशन तर्फे कोपरगाव शहर, जेऊर कुंभारी, कोकामठाण, माहेगांव देशमुख, येवला, अहमदनगर (आयकर विभाग व विक्रीकर विभाग) या ठिकाणी तिरंगा ध्वज (पॉकेट पिन) मोफत वाटण्यात येतील. हे अभियान पूर्णत्वाकडे नेण्यासाठी महारुद्रा फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी व सभासद जबाबदारीने कार्य करत आहेत.
महारुद्रा फाऊंडेशन कार्यकारी मंडळ*
१ श्री. शशिकांत वक्ते (अध्यक्ष)
२ श्री. अमोल राऊत (उप अध्यक्ष)
३ श्री. सागर चव्हाण (सचिव)
४ श्री. सिद्धेश दौंड (सह सचिव)
५ श्री. अर्जुन गायकवाड (सी ए ) तज्ञ सल्लागार
६ श्री. गणेश उगले (सी ए )
७ श्री. गणेश गायकवाड (सी ए )
८ श्री. किरण देशमुख (सी ए ) – कोषागार
९ श्री. वैभव रक्ताटे(सी ए )
१० श्री. राहुल गोर्डे (सी ए )
११ श्री. सुधाकर होन (सदस्य)
१२ श्री. योगेश चव्हाण (सदस्य)
१३ श्री. अजिंक्य चव्हाण (सदस्य)
१४ श्री. सुधाकर वक्ते (सदस्य)
१५ श्री. संतोष होन (सदस्य)


