
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यात जेऊर कुभांरी गावतील महाराणा प्रताप दक्षता समितीच्या युवकांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
कार्यक्रमात प्रथम महाराणा दक्षता समितीच्या सर्व सदस्यांच्या
हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले यावेळी सर्व उपस्थितांनी राजांची आरती करून शिवजी महाराजांच्या घोषणा देण्यात आल्या.तसेच मारूती मंदीर ते जेऊर गावा या ठिकाण पर्यंत दुचाकी वर मिरवणूक काढण्यात आली
शिवमुद्रा प्रतिष्ठान ,मुंबादेवी युवा प्रतिष्ठान व शिवसुत्र युवा प्रतिष्ठान हे मंडळ गेल्या चार वर्षांपासून शिवनेरी गडावरून मशाल घेऊन येत असते.या मंडळीच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी
असे उदबोधन केले की छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे म्हणून भावी पिढीला शिवरायांचे जीवन व त्यांच्या कार्याची माहिती पोहचवून आदर्श स्वराज्य व्हावे यासाठी प्रयत्न करणे ही आजची गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. यावेळी उपसरपंच जालिंदर चव्हाण, आप्पासाहेब वक्ते, कल्याणराव वक्ते, बापुराव वक्ते, महेंद्र वक्ते, भानुदास वक्ते, पांडुरंग वक्ते, किरण पाटीलबा वक्ते,विशाल गुरसळ,शशिकांत वक्ते, अजिंक्य चव्हाण, राहुल वक्ते,निलेश चव्हाण, सागर गुरसळ, विक्रम चव्हाण किरण गुरसळ , दादा चव्हाण ,विकी जगताप, विश्वजीत वक्ते, ऋषी वक्ते आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्र संचालन कल्याणराव गुरसळ, बापुराव वक्ते यांने केले. तर आभार आप्पासाहेब वक्ते यांनी मानले .


