
जेऊर कुंभारी वार्ताहर
स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेच्या परिसरात तिरंगा फडकवत राष्ट्रगीताच्या गजरात देशभक्तीची भावना जागविण्यात आली. प्रभात फेरी काढून शाळेच्या परिसरात देशभक्तीच्या घोषणांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
न्यू इंडिया इन्शुरन्सचे मॅनेजर भिमराज वक्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भिमराज वक्ते यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी मेहनत, शिस्त आणि चांगले संस्कार अंगीकारल्यास भविष्यात ते देशाचे जबाबदार नागरिक बनतील, असा संदेश त्यांनी दिला.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून डॉ. सुजित गिरमे व त्यांचे सुपुत्र मयूर गिरमे यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या उपक्रमाचे उपस्थित ग्रामस्थांनी कौतुक केले. माजी सरपंच राजेंद्रजी गिरमे, किशोर गिरमे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमधून खणखणीत भाषणे केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेली संगीतमय कवायत पाहून उपस्थितांची मने जिंकली.
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील जिल्हा गुणवत्ता यादी स्थान मिळवलेली समृद्धी देवकर व इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. इयत्ता चौथी शिष्यवृत्तीतील पात्र विद्यार्थ्यांना देखील यावेळी बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक किसन सोळके, माजी पंचायत समिती सभापती शिवाजी वक्ते, संजीवनी कारखान्याचे संचालक संचालक बाळासाहेब वक्ते, माजी सरपंच राजेंद्रजी गिरमे,पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड, यादवराव सोसायटीचे चेअरमन कोंडीराम वक्ते, उपसरपंच जालिंदर चव्हाण, भाजपा युवामोर्चा कोपरगाव तालुकाध्यक्ष किशोर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड, शाळा व्य. समितीचे अध्यक्ष महेश गुरसळ, कैलास वक्ते, भास्कर चव्हाण,कल्याणराव गुरसळ, किरण पाटीलबा वक्ते, अशोकजी राऊत, द्वारकानाथ देवकर,भास्करराव गायकवाड, शिवाजी वक्ते, अमोल राऊत,सुनील गायकवाड,कैलास चव्हाण, मयूर गिरमे, नारायण गुरसळ, सागर गुरसळ, राहुल गुरसळ, सतीश गायकवाड,सतीश वक्ते,संदीप वक्ते,नाना मोहिते,निलेश गायकवाड यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका पर्वत मॅडम, अनुज ढुमणे सर,ज्योती गोर्डे मॅडम तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अनुज ढुमणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका वंदना पर्वत मॅडम यांनी केले. शेवटी मान्यवरांनी आणलेला खाऊ व मिठाई वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळेचा परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून ‘शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी’चा संदेश देण्यात आला.


