
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर
कुंभारी गावात महावितरण कंपनीने विजबिल वसुलीच्या नावाखाली पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या रोहीत्राचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू केल्याने शेतक -यामध्ये तिव्र नाराजी निर्माण झाली आहे .
सध्या शेतीमध्ये गहू, हरबारा, ऊस मका ही पिके उभी आहे.उन्हाची तिव्रा वाढल्याने उभी असल्याली पिके पाण्यावर आली आहे शेतक-यांना रात्रपाळीकरून पिकांना पाणी द्यावे लागते.मागिल आवर्तनात शेतक-यांच्या शेतात पाणी पोहचता ना पोहचते लगेच रोटेशन बंद करण्यात आल्या.अशा अनेक संकटाना शेतक-यांनी सामोरे जावे लागते तेव्हा महाविरणाने वीजबील वसुलीसाठी पुरवठा खंडीत करू नये असे आवाहन जेऊर कुंभारी गावातील
काँग्रेस तालुका अध्यक्ष नितीन शिंदे यांनी केले आहे.
सध्याची परिस्थिती बघता शेतकऱ्यांनी रब्बी पिकाच्या मशागतीसाठी बियाणे खते यासाठी खर्च केला आहे ज्यावेळी रब्बीचे पीक निघतील तेव्हा शेतकऱ्याकडे पैसे उपलब्ध होतील तरी महावितरण कंपनीने आता विज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांच्या पोटावर मारू नये अशी विनंती जेऊर कुंभारी गावातील काँग्रेस तालुका अध्यक्ष नितीन शिंदे
यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही तसेच पंचनामे करूनही अजुन भरपाई देखील मिळाली नाही या हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने गहू कांदा हरभरा ऊस ही पिके घेतली आहे उन्हाचा तडखा वाढल्यामुळे पिकाला वेळेवर पाणी देणे गरजेचे आहे त्यात महावितरणने जर विजबिल वसुलीसाठी रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केला तर शेतकर्यांचे उभे पीक जळून जाईल व शेतकरी देशोधडीस लागेल रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडवणूक करून पिकांचे प्रचंड नुकसान करण्याचे काम महावितरण ने थांबावे नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा काँग्रेस तालुका अध्यक्ष नितीन शिंदे यांनी दिला.


