
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावातील तरुणांनी एकत्र येऊन समाज हितासाठी व समाज बांधवांच्या अडीअडचणी सोडवविण्याचा संकल्प केला.
आज दि ६ २ २०२२ रोजी जेऊर कुंभारी गावातील पौराणिक मंदिर गंगेश्वर महादेला नतमस्तक होऊन तरूणांनी समाज्याच्या उन्नतीसाठी आम्ही सर्व एकनिष्ठ आहोत अशी शप्पथ घेतली जेऊर कुंभारी गावात कऱ्हेकर समाज मोठ्या प्रमाणात आहे या समाज्यातील तरूणांनी राजकारण विरहीत समाज्यात एकी व सलोखो निर्माण करण्यासाठी सतत्याने प्रयत्न करणार आहे असा एकनिष्ठेचा विडा गंगेश्वर महादेवाला साक्ष माणून संकल्प केला आहे
यावेळी उपसरपंच जालिंदर चव्हाण ,पांडुरंग वसंतराव वक्ते यांनी मार्गदर्शन करताना सांगीतले की समाज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करणार आहोत तसेच समाजहीता साठी तरूणांनी पुढाकार घ्याव असे आवाहन केले आहे.
या प्रसंगी बापुराव वक्ते, धोंडीराम वक्ते,कल्याणराव गुरसळ, लक्ष्मण वक्ते, कोंडीराम वक्ते, गोरख चव्हाण
महेंद्र वक्ते, किशोर वक्ते, रामभाऊ वक्ते,संजय चव्हाण, किरण वक्ते,
तुषार गुरसळ, भानुदास वक्ते,शिवाजी वक्ते, विजू सोळके, करणा वक्ते,सुनिल वक्ते बाळासाहेब जाधव, शशिकांत गुरसळ, शशिकांत वक्ते, गंगाराम सोळके, दादासाहेब चव्हाण, कैलास चव्हाण, नाना गुरसळ विशाल गुरसळ अजिंक्य चव्हाण, पोपट सोळके, मार्तंड जाधव
आदीस तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


