Thursday, April 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुर्शतपुर शिवारात आद्यरेषीय प्रक्षेत्र चाचणी अंतर्गत फुले भारती उन्हाळी भुईमुग वाणाचे प्रात्याक्षिक!!

मुर्शतपुर शिवारात आद्यरेषीय प्रक्षेत्र चाचणी अंतर्गत फुले भारती उन्हाळी भुईमुग वाणाचे प्रात्याक्षिक!!

कोपरगाव प्रतिनिधी

           शेतक-यांमध्ये पीक बदल व शाश्वत मृदा संवर्धन जागृती व्हावी या उददेशाने तालुक्यातील मुर्शतपुर शिवारात आद्यरेषीय प्रक्षेत्र चाचणी अंतर्गत मकरसंक्रांत पर्वानिमीत्त फुले भारती उन्हाळी भूईमुग वाणाचे लागवड प्रात्याक्षीक कार्यक्रम घेण्यात आला.
अखिल भारतीय तेलबिया संशोधन केंद्र जुनागड, तेलबिया संशोधन केंद्र जळगांव, व कोपरगांव तालुका कृषि विभागाच्या सहकार्याने तालुका कृषि अधिकारी मनोज सोनवणे यांच्या हस्ते शेतक-यांना उन्हाळी भुईमुग निविष्ठांचे यावेळी वाटप करण्यांत आले. मुर्शतपुर येथील प्रगतशिल शेतकरी रामदास शिंदे यांच्या वस्तीवर हा कार्यक्रम घेण्यांत आला. अध्यक्षस्थानी तेलबिया संशोधन केंद्र जळगांव येथील कृषि विस्तार प्रवर्तक पोपटराव खंडागळे होते.प्रारंभी कृषि अधिकारी अविनाश चंदन, कृषि पर्ववेक्षक राजेंद्र तुंभारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तालुका कृषि अधिकारी मनोज सोनवणे यांनी उन्हाळी सोयाबीन, हरभरा, कांदा, गहु लागवड व उत्पादन याविषयी माहिती दिली. श्री. पोपटराव खंडागळे अध्यक्षपदावरून बोलतांना म्हणाले की, शेतक-याचे प्रति एकरी उत्पादन वाढले पाहिजे. पीक बदल व शाश्वत मृदा संवर्धनाने काय फायदा होतो तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत फुले भारती उन्हाळी भूईमुग वाणाची प्रत्येकी दहा गुंठे क्षेत्रातील बीज प्रक्रिया लागवड, पाणी, खत व्यवस्थापन त्याचप्रमाणे गादीवाफयावर दीड फुट सरी घेवुन ३ सेंटीमिटर खोल व दोन झाडांमध्ये १० सेंटीमिटर अंतर लागवड याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. फुले भारती उन्हाळी भुईमुगावर आठ वर्षे संशोधन करण्यांत आले त्यातुन इतर पिकापेक्षा यात ५३ टक्के तेल व ३१ टकके उत्पादन वाढ प्रयोगाअंती निरीक्षण नोंदले गेले. ही जात रोग प्रतिकारक आहे. शेतक-यांने सतत  प्रयोगशील असावे, माहिती तंत्रज्ञानाने जग जवळ आल्याने आधुनिकतेची कास धरत शेतक-यांने विविध पिकाबाबत असणा-या शंकांचे तज्ञांकडुन वेळच्यावेळी निरसन करावे. पीकावरील कीड व रोग प्राथमिक अवस्थेत असतांनाच त्याबाबत वेळीच उपाययोजना केल्यास भविष्यातील नुकसानीची तीव्रता कमी करता येते. पीक वाढीचा मुलमंत्र प्रत्येकाने आत्मसात केल्यास तीळगुळाचा आनंद द्विगुणित होतो असे ते शेवटी म्हणाले.  काही शेतकऱ्यांनी शाश्‍वत उत्पादन वाढ कशा पद्धतीने मिळाले याचे अनुभव सांगितले.  यावेळी प्रगतशिल शेतकरी सर्वश्री हरिभाऊ शिंदे, सुनिल दवंगे, कैलास शिंदे, सचिन शिंदे, साहेबराव उगले, जालिंदर शिंदे, आप्पासाहेब शिंदे, सुधाकर शिंदे, दिलीप शिंदे, संजय उगले, गणेश शिंदे, काका शिंदे यांच्या शंकांचे निरसन करण्यांत आले. शेवटी कृषी सहायक संगिता सोळसे यांनी आभार मानले.अखिल भारतीय तेलबिया संशोधन केंद्र जुनागड, तेलबिया संशोधन केंद्र जळगाव व कोपरगांव तालुका कृषि विभागाच्या सहकार्याने तालुका कृषि अधिकारी मनोज सोनवणे यांच्या हस्ते मुर्शतपुर शिवारातील शेतक-यांना उन्हाळी भुईमुग निविष्ठांचे वाटप करण्यांत आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!