
कोपरगाव प्रतिनिधी
जेऊर कुंभारी येथील समाजिक कार्यकर्ते तसेच आमदार आशुतोष काळे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते पाटीलबा शहाजी वक्ते यांनी आपल्या वाढदिवस पैशांची उधळण न करता जनार्दन स्वामी आश्रमात भाविकांना एक वेळेचे जेवण दिले आहे,मकर संक्रांतीचे औचित्य साधून परम पूज्य रमेशगिरी महाराज यांच्या दर्शनासाठी नेहमी हजारो भाविक येत असते या मंगलमय दिनी पाटीलबाव वक्ते यांनी अन्नदान केले. आज समाज्यातील असे अनेक घटक आहे त्यांना आपण नेहमी मदत केली पाहीजे. पाटीलबा यांच्या माध्यमातून समाज्याला एक चांगला संदेश मिळाला आहे.तसेच जेऊर कुभांरी गावच्या विकामध्ये ते नहमी सक्रिय असतात आमदारआशुतोष काळे यांचे कार्य समाजापर्यंत नेण्याचे नेहमी प्रयत्न करतात असतात. आशा निष्ठावंत कार्यकर्तेला आमदार आशुतोष काळे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पाटीलबा वक्ते यांनी बोलतांना असे सांगितले की कोपरगाव तालुक्याला संतांची भुमी असे म्हणतात जनार्दन स्वामी, जंगली आश्रम,शिर्डी हे देवस्थाने लाभले आहे. देश व विदेशातील भावीक दर्शनासाठी नेहमी येत असतात.समाज्याचे आपले काही देणे आहे या उद्देशाने पाटीलबा वक्ते यांनी जनार्दन स्वामी आश्रमात अन्नदान केले.
या वेळी जनार्दन स्वामी आश्रमाचे भजनी मंडळ यांच्या वतीने पाटीलबा यांचा सत्कार करण्यात आला.


