
‘बालसंस्कार समूह महाराष्ट्र’चा स्तुत्य उपक्रम!!
कोपरगाव प्रतिनिधी
महाराष्ट्रातील वाडी-वस्तीवर ज्ञानदानाचे पवित्र कार्य अनेक शिक्षिका समर्पण वृत्तीने करत आहेत. त्यांच्या कार्याला कौतुकाची थाप द्यावी म्हणून आज राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती निमित्त प्रतिनिधिक स्वरूपात 'डिजिटल प्रमाणपत्र'देऊन ' सन्मान केला. व्हाट्सअप द्वारे ऑनलाइन गुगल फॉर्म भरणाऱ्या २५० शिक्षकांचा आज ऑनलाईन झूम मिटींग द्वारे सन्मान झाला.आदरणीय श्री.गोविंद नांदेडे साहेब पूर्व शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली हा सन्मान सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका प्रसिद्ध लेखिका काशीकन्या वनमाला पाटील उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बालसाहित्यिक अंजली अंत्रे, उपक्रमशील शिक्षिका नजमा शेख बीड, जया कुलथे ,अहमदनगर ,कविता पुढाले उस्मानाबाद यांनी आपले मनोगत व्यक्त करून समूहाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून प्रमाणपत्र प्राप्त सर्व शिक्षिकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समूहाचे संयोजक सुदाम साळुंके यांनी केले. आपले कुटुंब संभाळून कोरोना काळामध्ये शिक्षिकांनी महत्वाचे योगदान विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिले. त्याचे कौतुक होणे गरजेचे आहे. त्यासाठी आमच्या समूहाचा हा छोटासा प्रयत्न असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे नितांत सुंदर सूत्रसंचालन समूहाचे राज्य संयोजक नवनाथ सूर्यवंशी यांनी केले.
समूहाच्या वतीने सहसंयोजक सुनीता इंगळे व शबाना तांबोळी यांनी आपल्या मनोगतातून समुह राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये
काशीकन्या वनमाला पाटील यांनी सर्व शिक्षकांमध्ये जिजाऊ व सावित्री यांचा अंश आहे त्या नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे कर्तुत्ववान विद्यार्थी घडल्याशिवाय राहणार नाही अशी आशा व्यक्त केली.
समूहाचे सहसंयोजक अकबर शेख,राजेंद्र पोटे, बालाजी नाईकवाडी, कैलास भागवत,निलेश दौंड,सुप्रिया झिंजुर्डे,मनीषा पांढरे, सुशीला गुंड व वैशाली भामरे यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समूहाचे सहसंयोजक अशोक शेटे यांनी केले.


