
कोपरगाव प्रतिनिधी
शासनाने १५ते १८ वयोगटातील विद्यार्थींसाठी लसीकरण उपलब्ध करूण देण्यात आले आहे.कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण हा एकमेव मार्ग आहे .त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे आरोग्य केंद्राच्या माध्यामातुन लसीकरण मोहीम सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यात तहसीलदार विजय बोरूडे यांनी वेळोवेळी प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत त्यास ज्या व्यक्तीचा दुसरा डोस घेतला नाही त्यांना कोपरगाव मध्ये प्रवेश बंद केला आहे तरी नागरीकांनी लस घ्यावी असे आवाहन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक संजयराव होन यांनी केले आहे.तसेच
१५ते१८ वयोगटातील मुलांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले तरच शाळा पुन्हा पुर्वत सुरू होईल. तसेच प्रत्येक गावातील या वयोगटातील मुलींनी लसीकरण करूण घेणे गरजचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


