Thursday, April 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्रामीण भागातील प्रत्येक रस्ता मुख्य रस्त्याला जोडणार!! - आ. आशुतोष काळे

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्ता मुख्य रस्त्याला जोडणार!! – आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी
                            
ग्रामीण भागाच्या विकासात रस्त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ग्रामीण भागातील गावांना जोडणारे रस्ते जोपर्यंत मुख्य रस्त्याला जोडले जात नाही तोपर्यंत ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळणार नाही. त्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक रस्ता हा मुख्य रस्त्याला जोडून ग्रामीण सर्वांगीण विकास करणार आहे असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.
 कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे विविध योजनांअंतर्गत कोकमठाण गाव ते माळवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, श्री लक्ष्मीमाता देवस्थान परिसर सुशोभीकरण तसेच राजेंद्र देशमुख यांच्या वस्तीकडे जाणारे सी.डी. वर्क करणे व धोत्रे येथे २६.२५ लक्ष निधीतून बांधण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ३ शाळा खोल्यांचे भूमिपूजन आदी विकास कामांचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्या सौ. सोनाली साबळे होत्या. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक बाळासाहेब बारहाते, जि.प. सदस्य राजेश परजणे, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, पं.स. सदस्य मधुकर टेके उपस्थित होते.
पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, कोकमठाण परिसरातील २०१९ च्या विधानसभा सभा निवडणुकीपूर्वी प्रलंबित असलेली विकासकामे निवडणुकीनंतर दोनच वर्षात बहुतांशी पूर्ण करण्यात यश मिळाले असून पुढील काळात हि सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्वोतोपरी मदत करू. कोकमठाण गावाला ऐतिहासिक, पौराणिक वारसा असून कोकमठाणमध्ये श्री संत जनार्दन स्वामी आश्रम, जंगलीदास महाराज आश्रम तसेच कोकमठाण व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले लक्ष्मीआई माता जागृत देवस्थान आहे. या देवस्थानाकडे आजवर कुणीही लक्ष दिले नाही त्यामुळे हे देवस्थान विकासापासून वंचित होते. मात्र जि.प. मध्ये सत्तांतर झाल्यामुळे लक्ष्मीआई माता देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळवून दिल्यामुळे या देवस्थानचा विकास करणे शक्य झाले आहे व यापुढे देखील कोकमठाण व परिसराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली. यावेळी दिलीप बोरनारे, सुदाम लोंढे, विजय रक्ताटे, राहुल जगधने, ताराचंद रक्ताटे, संजय थोरात, विजय रक्ताटे, विजय देशमुख, मच्छिंद्र देशमुख, विजय थोरात, आबासाहेब रक्ताटे, प्रभाकर धिवर, अनंत रक्ताटे, अजित रक्ताटे, विशाल जाधव, संतोष लोंढे, सोपानराव काशीद, दत्तात्रय चेळेकर, चंद्रकांत जपे, राजेंद्र रोहोम, जॉनी धिवर, बाळासाहेब पवार, ज्ञानेश्वर रक्ताटे, गोरक्षनाथ लोहकणे, दिपक रोहोम, पंकज लोंढे, बंटी सय्यद, संदीप लोहकणे,संजय जामदार, गणेश घाटे, मुजाफरभाई सय्यद, तालीफ सय्यद, तुकाराम पोटे, गणेश माळवदे, तात्यासाहेब काटे, चांगदेव चव्हाण,रमेश देवकर, रवींद्र जामदार, अण्णासाहेब जामदार, काकासाहेब शिंदे, अशोक रोकडे,दत्तात्रय माळवदे, बाळासाहेब माळवदे,प्रभाकर घाटे, अशोक काटे, जालिंदर शिंदे,रमेश शिंदे, अहमद सय्यद, नारायण जामदार,संजय जानराव, विशाल कुमावत, रखमा जानराव, राजेंद्र बेलदार, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, अभियंता उत्तमराव पवार, शाखा अभियंता गुंजाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कोकमठाण येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व धोत्रे येथे जिल्हा परिषद प्राथमिक ३ शाळा खोल्यांचे भूमिपूजन प्रसंगी आ. आशुतोष काळे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!