
कोपरगाव प्रतिनिधी
शेतक-यांनी आपल्या शेतीला पुरक व्यवसाय निवडला पाहीजे त्यांचे अप्रतिम उदाहरण म्हणजे सुनिल कुलकर्णी यांनी आपल्या शेतात उभारलेले कृषी पर्यटनस्थळ
सुनिल कुलकर्णी यांनी आपल्या दहा ते बारा एकरा मध्ये कृषी पर्यटन स्थळाची निर्मिती करून शेतक-यां पुढे एक आदर्श निर्माण केलाआहे.
लहानपणापासून शेतीव्यवसायाची आवड असणाऱ्या कुलकर्णी यांनी पोटच्या मुलाप्रमाणे झाडांचे संगोपन व संवर्धन केले त्यांना वृक्षां विषय आत्मियता होती. सावळीविहीर येथील शेती कृषीफॉर्म या ठिकाणी विविध जातींचे झाडांची लागवड केली तसेच फुलझाडे, नारळ,आंबा चिक्कू,झाडांची व फळझाडांची लागवड केली असुन त्यांची उंची आजमितीला दहा ते बारा फुट एवढी आहे.
सुनिल कुलकर्णी यांनी हे कृषी केंद्र पर्यटनसाठी खुले केले आहे. अल्पावधीत अगत्य कृषी पर्यटन केंद्र या नावने हे कृषी पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कानाकोपयात प्रसिद्ध झाले आहे.
हे पर्यटन स्थळ बघण्यासाठी नाशिक,औरंगाबाद, पुणा, या भागातील नागरीक येऊन भेट देत असतात. पर्यटकांचेे मन रमण्यासाठी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी घोडागाडी, नॅरीकेशन टाॅवर, रेन डान्स,बोटींग, स्विमिंग पुल,
नर्सरी व बियाणांची माहिती ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.तसेच नर्सरीची स्थापना करण्यात आली.त्यात विविध जातींचे फुलझाडे,फळझाडे असल्यामुळे कृषी केंद्रे पर्यटकांचे मन मोहक करणारे आहे. तसेच विद्यार्थी गेटु गेदर करण्यासाठी येत असतात.तसेच पर्यटकांसाठी थोड्याच दिवसात हुरडा पार्टी सुरू करणार आहे. गावरान जेवन दिली जाणार आहे.
तेव्हा पर्यटकांनी गावरान जेवनाचा आनंद घेण्यासाठी अगत्य कृषी पर्यटन स्थळाला भेट द्यावी असे आवाहन सुनिल कुलकर्णी यांनी सांगितले.


