Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedआ. आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यामुळे खिर्डी गणेशच्याआरडीएसएस योजनेच्या कामांनी घेतला वेग!!- रायभान रोहम

आ. आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यामुळे खिर्डी गणेशच्याआरडीएसएस योजनेच्या कामांनी घेतला वेग!!- रायभान रोहम

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील रखडलेल्या आरडीएसएस योजनेच्या कामांना चालना मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे खिर्डी गणेशच्या केद्र शासनाच्या आरडीएसएस योजनेच्या कित्येक दिवसांपासून थांबलेल्या कामांनी वेग घेतला असल्याची माहिती गौतम बँकेचे संचालक रायभान रोहोम यांनी दिली आहे.आरडीएसएस योजने अंतर्गत २०२२ मध्ये २२६ कोटी रुपयांचा निधी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या योजनेतून उर्जा विभागाची विविध कामे केली जातात. यामध्ये वीज उपकेंद्रांची क्षमता वाढ करणे, नवीन वीज रोहीत्र बसविणे, कृषी व घरगुती वीज ग्राहकांचा वीज पुरवठा स्वतंत्र करणे, विजेचे पोल उभे करणे, वीज वाहिन्या टाकणे, वीज गळती कमी करणे आदी कामांचा समावेश आहे.कोपरगाव मतदार संघातील शेतकरी व नागरिकांना सुरळीत व अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी आमदार आशुतोष काळे सातत्याने प्रयत्नशील असल्यामुळे आरडीएसएस योजनेतून कोपरगाव तालुक्यात कुंभारी येथील वीज उपकेंद्रातील ०५ एमव्हीए क्षमतेचे रोहित्र १० एमव्हीएचे करणे. रवंदे वीज उपकेंद्रातील ३.१५ एमव्हीए क्षमतेचे रोहित्र ०५ एमव्हीएचे क्षमतेचे करणे. कोपरगाव शहर व ग्रामीण मिळून फिडरचा स्कोप २६ करणे. २२.३३ किलोमीटर उच्चदाब वीज वाहिनी टाकणे, १२ स्पेशल रोहित्र बसविणे,४१ ठिकाणी १०० के.व्ही.ए.चे रोहित्र बसविणे व २५.४१ किलोमीटरची कमी दाब वीज वाहिनी टाकणे आदी कामे प्रगतीपथावर आहेत.
यामध्ये खिर्डी गणेश सबस्टेशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध प्रलंबित कामांचा समावेश आहे. ज्या कामांना आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे गती मिळाली असून त्याबद्दल खिर्डी गणेशच्या नागरीकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. यामध्ये नवले वस्ती गावठाण, सुराळकर वस्ती, नवीन कॅनॉल परिसरात रोहित्र बसविणे काम लवकरच पूर्ण होणार असून त्यामुळे कृषी वीज वाहिन्यांवर असणारा भार कमी होऊन असंख्य घरगुती वीज ग्राहकांना गावठाण वाहिनीवरून पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे खिर्डी गणेशच्या कृषी व घरगुती वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून खिर्डी गणेशच्या नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असल्याचे गौतम बँकेचे संचालक रायभान रोहोम यांनी सांगितले आहे.अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या २२६ कोटी रुपयांच्या निधीतून जास्तीत जास्त निधी कोपरगाव मतदार संघासाठी आमदार आशुतोष काळे यांनी आणला आहे. २०२२ पासून आरडीएसएस योजनेतून कोपरगाव तालुक्यात कामे सुरु आहेत. ज्या कामांमध्ये अडथळे आले ते सर्व अडथळे आमदार आशुतोष काळे यांनी दूर करून बांधावर, शेतात बांधावर शेतकऱ्यांना पोल उभे करतांना येणाऱ्या अडचणी दूर करून ती सर्व कामे पूर्ण केली आहेत मात्र यासाठी आपण पाठपुरावा केल्याचा आव कुणी आणू नये.-संचालक रायभान रोहोम.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!