
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने शहरातील मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. नगराध्यक्ष पराग संधान यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून नालेसफाई स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली.जून महिन्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर संबंधित नाल्यांवर पाणी साचण्याच्या समस्या यापूर्वी अनेकदा दिसून आल्या होत्या. त्यामुळे संभाव्य अडचणी लक्षात घेऊन नगरपालिकेने आधीच खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित नाल्यांमधील घाण, कचरा व साचलेला गाळ काढण्याचा निर्णय घेतला आहे.
या मोहिमेअंतर्गत गोकुळनगरी पुल ते नदीपर्यंत असलेल्या खंदक नाल्यासह आढाव वस्ती ते खडकी परिसरातील प्रमुख नाल्यांच्या साफसफाईच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा व इतर घाण काढून टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यास मोठी मदत होणार आहे. आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर स्वच्छता व नागरिकांच्या आरोग्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपालिकेमध्ये विविध विकासात्मक व नागरिकाभिमुख मोहिमा राबविण्यात येत आहे त्यातून नागरिकांना अपेक्षित समस्या दूर होण्यास मदत होत आहे. शहर स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांबाबत नगरपालिका प्रशासन सकारात्मक पावले उचलत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई अत्यंत व्यवस्थित व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात यावी, कोणत्याही ठिकाणी गाळ किंवा कचरा शिल्लक राहू नये, अशा स्पष्ट सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचेही नगरध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले
या प्रसंगी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आढाव, आरोग्य सभापती वैभव आढाव, संदीप देवकर, सौ. विजया ताई देवकर, कैलास मंजूळ, संजय उदावंत, सिद्धार्थ सोनवणे, निसार शेख, सिद्धेश कपिले, वैभव गिरमे, दीपक जपे, राहुल खरात, ॲड. चंद्रकांत टेके, कैलास सोमासे, कल्पेश नरोडे, रिंकेश नरोडे, प्रशांत वाबळे, शोहेब शेख, साजिद पठाण, स्वराज सूर्यवंशी, भैय्या नागरे, आयुब शेख, संदीप कोपरे, युनूसभाई शेख तसेच नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


