Tuesday, May 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांचा ११ मेला अहिल्यानगर जिल्ह्यात जंगी नागरी...

केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांचा ११ मेला अहिल्यानगर जिल्ह्यात जंगी नागरी सत्कार; पालकमंत्री विखे पाटील यांची राहणार प्रमुख उपस्थिती

कोपरगाव प्रतिनिधी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांची सलग तिसऱ्यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल, अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचा प्रथमच भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम राहुरी तालुक्यातील कनगर येथे रविवार, दिनांक ११ मे २०२६ रोजी संपन्न होणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व कोपरगांव तालुकाध्यक्ष अनिल रणनवरे, शहराध्यक्ष सोमनाथ लोहकरे यांनी दिली आहे.या ऐतिहासिक सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. डॉ. रामदास आठवले यांची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कामगिरी आणि त्यांची तिसऱ्यांदा झालेली राज्यसभा निवड, याचा गौरव करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ‘जंगी’ सत्काराचे नियोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला रिपाईचे राज्याचे उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्याचे उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे,राज्य सचिव दिपकराव गायकवाड,राजाभाऊ कापसे, विभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, ज्येष्ठ नेते कैलास शेजवळ, भाऊसाहेब पगारे, राजन ब्राह्मणे, रमेश शिरकांडे, चंद्रकांत सरोदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच राज्य महिला आघाडीच्या रमाताई धीवर, जिल्हाध्यक्षा सीमाताई बोरुडे, स्नेहल दिवे, वैशाली सोनवणे यांसह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.सत्काराच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. यामध्ये कोपरगावचे अनिल रणनवरे, राहुरीचे विलास साळवे, श्रीरामपूरचे सुनील शिरसाट, नेवासा तालुकाध्यक्ष सुशील धायजे, राहाता तालुकाध्यक्ष धनुभाऊ निकाळे, अकोले तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे, संगमनेरचे आशिष शेळके यांसह अनेक मान्यवर आपापल्या समर्थकांसह उपस्थित राहणार आहेत.नेवासा तालुक्यातून सुशील धायजे, पप्पू इंगळे, विजय राजगुरू, संतोष मोरे, संजय बनसोडे, नितीन भालेराव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा कनगरकडे रवाना होणार आहे. मुस्लिम आघाडीचे पप्पूभाई सय्यद, युनूस भाई शेख आणि इतर पदाधिकाऱ्यांनीही या सोहळ्यासाठी कंबर कसली आहे.या सत्कार सोहळ्याला जिल्ह्यातून रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आठवले प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विजयराव खरात, कैलास कासार, मधुकर सोनवणे, योगेश मन्तोडे, विजय अडांगळे, शरद जमदाडे यांसह जिल्हा व तालुका पातळीवरील शेकडो पदाधिकाऱ्यांनी केले आहे.डॉ. रामदास आठवले यांच्या निवडीमुळे दलित, शोषित आणि वंचित घटकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, हा सत्कार सोहळा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात लक्षवेधी ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!