
जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील श्री मारुती मंदिर परिसरात इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरमेवस्ती येथील गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा सन्मान करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे मॅनेजर भिमराज वक्ते होते. प्रमुख पाहुणे म्हणून आरपीआय प्रदेश सचिव दिपकराव गायकवाड, उपसरपंच जालिंदर चव्हाण, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन कोंडीराम वक्ते, व्हा. चेअरमन दादासाहेब चव्हाण, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किशोर गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड,
संदीप राऊत, सामाजिक कार्यकर्ते कैलास चव्हाण, सतीश वक्ते, गणेश अंबिलवादे, प्रविण देवकर, सुनील गायकवाड, कुंदन पठारे, अनिता सोळके, जयश्री गुरसळ, पुनम गुरसळ, सोनाली गुरसळ, संगिता गायकवाड,कल्याबाई धीवर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या समृद्धी प्रविण देवकर (२२६), आराध्य सतीश वक्ते (२२६), आराध्या नवनाथ गुरसळ (२२२), संध्या सुनील गायकवाड (२२०), आराध्या दिनकर सोळके (२०६), यश राहुल गुरसळ (१९०), स्वराज धनंजय देवकर (१८२), अमृता किशोर गायकवाड (१६६), धनंजय गणेश अंबिलवादे (१६६) आणि सुदर्शन दावीद धीवर (१६२) या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात भिमराज वक्ते म्हणाले, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो ते जिद्दीने आणि प्रामाणिकपणे आत्मसात करतो, तो जीवनात निश्चित यशस्वी होतो. विद्यार्थ्यांनी सातत्य, शिस्त आणि कठोर परिश्रमाच्या बळावर उच्च ध्येय गाठावे, तर पालकांनी मुलांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यांना सातत्याने प्रोत्साहन द्यावे,” असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.
आरपीआय प्रदेश सचिव दिपकराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेतील यशावर न थांबता स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन केले. उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करत गावातील शैक्षणिक गुणवत्ता अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते कैलास चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने स्थिती.


