
जेऊर कुंभारी वार्ताहर
“वंदे मातरम” च्या जयघोषाने आणि तिरंग्याच्या फडकण्याच्या दिमाखदार दृश्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गिरमेवस्ती परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या थाटामाटात आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला.
संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते,माजी सरपंच राजेंद्र गिरमे,माजी उपसरपंच जालींदर चव्हाण,ग्रा.पं. सदस्य प्रदिप गायकवाड,शा.व्य.समिती अध्यक्ष महेश गुरसळ, ग्रामसेवक संजय दुशिंग,वाघ गुरुजी,नारायण गुरसळ, संजय देवकर, बारकू मेहेत्रे, यशवंत वक्ते,शिवाजी वक्ते, सतीश गायकवाड,किसन शेळके, देवराम जाधव,किशोर गायकवाड,द्वारकानाथ देवकर,प्रकाश वक्ते,प्रियंका जोशी, अनुज ढुमणे, सुदाम साळुंके,अंगणवाडी सेविका सिंधु वक्ते, आरोग्य सेवक, शा.पो.आहार कर्मचारी सुलोचना वक्ते, माता पालक गट सदस्य,आशा वर्कर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर आधारित सुंदर अशी खडे व बैठे कवायत सादर केली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी मनमोहक देशभक्तीपर गीत, प्रभावी भाषणे, कवितांचे सादरीकरण केले.
शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक आणि माजी विद्यार्थी यांची उपस्थिती लक्षणीय होती. बाळासाहेब वक्ते यांनी मनोगतात स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान, देशभक्तीचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा आदर्श यावर प्रभावी भाष्य केले. स्वातंत्र्य दिनावर आधारित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक सुदाम साळुंके यांच्या म्हणींच्या गोष्टी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाचे फलकलेखन व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुज ढुमणे यांनी केले, प्रास्तविक सुदाम साळुंके यांनी केले, तर आभारप्रदर्शन मुख्या. प्रियंका जोशी यांनी केले . “भारत माता की जय” या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि देशभक्तीचा संदेश प्रत्येकाच्या अंत:करणात रुजला. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


