Saturday, April 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedजेऊर कुंभारी गावाच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी जालिंदर चव्हाण!!

जेऊर कुंभारी गावाच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी जालिंदर चव्हाण!!

जेऊर कुंभारी वार्ताहर

राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या जेऊर कुंभारी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण यांची ग्रामसभेने बिनविरोध निवड केली.
२७ फेब्रुवारी रोजी सरपंच सुवर्णा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये ही निवड करण्यात आली.
ग्रामसभेत तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीसाठी जालिंदर चव्हाण यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. त्यामुळे ग्रामसेवक संजय दुशिंग यांनी ग्रामसभेसमोर ही माहिती दिली. त्याला उपस्थित ग्रामस्थांनी अनुमोदन दिल्यानंतर ग्रामसेवक संजय दुशिंग यांनी जालिंदर चव्हाण यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, कोल्हे कारखान्याचे संचालक सतिषराव आव्हाड, आरपीआय प्रदेश सचिव दिपकराव गायकवाड,
माजी सभापती शिवाजीराव वक्ते,मधुकर तुळशीदास वक्ते, गौतम बँकेचे संचालक बापुराव वक्ते, पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड, कोपरगाव शहरी पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार किशोर अंबादास जाधव, कृषी अधिकारी बाजीराव वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच वैशाली भोंगळे,यशवंत आव्हाड, किशोर वक्ते ,प्रदिप गायकवाड, ताराचंद लकारे,अनिता वक्ते, धनश्री वक्ते, अनिता गायकवाड,गंगुबाई जाधव,
महेंद्र वक्ते ,कल्याणराव गुरसळ,
सोपानराव वक्ते ,कोंडीराम वक्ते,
सुनिल वक्ते, दादासाहेब चव्हाण , गोरक चव्हाण, किशोर वक्ते अजिंक्य चव्हाण,किरण वक्ते, संजय वक्ते, नितीन इंगळे, शिवाजी वक्ते, तुषार गुरसळ, पोपट शिंदे, किरण शिंदे, भाऊसाहेब वक्ते, कर्णासाहेब वक्ते, संजय भोंगळे, नानासाहेब गुरसळ, शशिकांत गुरसळ ,किशोर गायकवाड, सुधाकर वक्ते , सागर गुरसळ, गोरक चव्हाण, भास्कर चव्हाण,
दौलत सोळके ,हनुमंतराव महेंद्र, किरण गुरसळ, बंटी महेंद्र, कैलास चव्हाण, राजेंद्र वक्ते, पिनु वक्ते, बाळासाहेब देवकर ,आप्पा सोळके पोपट सोळके, राणा वक्ते ग्रामपंचायतीचे क्लार्क आनंद बारसे संगीता वक्ते,
आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या निवडीबद्दल माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे , संजवनी उद्योग समूहचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे
यांनी अभिनंदन केले आहे. सर्वांना बरोबर घेऊन गावातील वाद गावामध्येच मिटवताना वाद होऊ नये यासाठी प्रयत्न करून महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून आदर्श काम करू, असे प्रतिपादन जालिंदर चव्हाण यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!