Thursday, April 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedनगरपालिकेने नवीन ५ नंबर साठवन तळ्याचा निघालेला मुरूम खडक भाजीपाला लिलाव मौंढा...

नगरपालिकेने नवीन ५ नंबर साठवन तळ्याचा निघालेला मुरूम खडक भाजीपाला लिलाव मौंढा , बैल बाजार , चमडा मार्केट येथे टाकला असता तर शेतकऱ्याची हाल झाली नसती!!-माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

कोपरगाव प्रतिनिधी

      कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात कर देते. त्या बदल्यात नगरपालिकेने शहराचा विकास विचारात घेऊन मार्केट कमिटीला स्वतःहून कामाच्या रूपात सहकार्य केलं पाहिजे. शहरामध्ये बैल बाजार रोडला दर सोमवारी जनावरांचा मोठा बाजार ,  चमडा लिलाव मोठ्या प्रमाणात भरतो. त्यात गाई , म्हशी ,बैल मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी शेतकरी आणतात. आठवडाभर रोज ग्रामीण भागातील शेतकरी भाजीपाला घेऊन लिलावासाठी पहाटे रोज येतात ,तोही बैल बाजार रोड जवळील खंदकनाला जवळील जागेत .परंतु पावसाळ्यात तिथे मोठ्या प्रमाणात चिखल होतो ,पाणी साचते , किडे , मशा वाढतात .अशा चिखलात जनता खात असलेली भाजीपाल्याचा लिलाव भरत असतो. तसाच आठवड्यातून एकदा बैल बाजार व चमडे बाजार भरतो. टेम्पो फसतात जनावरे पाडतात, त्यांना इजा होती जनावर आत आणायला व बाहेर घेऊन जायला व्यापाऱ्यांची, टेम्पो वाल्यांची खूप हाल होती.
 यामुळे नगरपालिकेने सहकारी शासकीय संलग्न संस्था या नात्याने व कोपरगाव शहरांमध्ये व्यापारी या लिलावासाठी मोठ्या प्रमाणात येत असल्याने छोटे-मोठे दुकाने रिक्षा,  टेम्पो वाले यांचा खूप मोठा आर्थिक दृष्ट्या व्यवहार होतो, चलन फिरतात. हे विचारात घेऊन पाच नंबरच येसगाव येथील साठवंतळ्यातील मुरूम मोठे दगड हे जर नगरपालिकेने मार्केट कमिटीला फ्री मध्ये किंवा आगदी नाममात्र दरात टाकून दिले असते  तर निश्चितपणे शहरातील व्यापारी रिक्षावाले शेतकरी यांचे व यांचे जनावरांचे हाल झाले नसते. 
      अजूनही दुसऱ्या चार नंबर तळ्याचे काम चालू होणार आहे, त्या तळ्यातील मुरूम गोटे हे नगरपालिकेने मार्केट कमिटी यांच्याशी चर्चा करून जनावरांचा बाजार , रोजच्या भाजीपाला लिलावाची जागा , चामडा मार्केट येथे टाकता येऊ शकते. जेणेकरून शेतकरी ,  व्यापारी , टेम्पो ट्रॅक्टर रिक्षा वाले यांचा होणारा त्रास कमी होईल.
       जसे गोदावरी नदीवरील मोठा जुना काळातला पूल पाडला गेला. त्याचे जर सर्व दगड नगरपालिका प्रशासनाने गोळा करून त्या दगडांमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिराचा खेटून दगडाचा पुरातन काळाचा दिसणारा असा जनतेला उपयोगी नवीन घाट नदीपात्राच्या दोन्ही बाजूला तयार झाला असता. त्याचे लाखो रुपये किमतीच्या दगडांची काय विल्हेवाट लावली याची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच पाच नंबर तळ्याच्या मुरमाच्या बाबत टेंडर मध्ये काय होते व टेंडर मध्ये जरी काही उणीव असली तरी नगरपालिका त्यात मार्ग काढू शकते.
   आधीच नगरपालिकेने शासनाच्या मार्फत २०११ साली छोटे-मोठे दुकानदार टपरीधारक यांना उठवून मोठा अन्याय टपरी धारकांवर व शहराच्या व्यापारावर झाला होता. 

त्यातच टाकळी फाटा येथील बीजगुणन केंद्र येथे संपूर्ण मार्केट कमिटी ,धान्य लिलाव, कांदा मार्केट ,जनावर बाजार , चमडी बाजार हलवायची चर्चा सध्या दबक्या आवाजात शहरात होत आहे.असे जर झाले तर मार्केट कमिटी जवळील, येवला रोड येथील सर्व दुकान ओस पडतील . यात हॉटेल वाले ,गाडी रिपेअर करणारे , अवजारे वाले ,शेती उपयोगी पेस्टिसाइड, बीबीयानांची सर्व दुकान स्टील सिमेंट ,लाकडी दरवाजे रासायनिक खतांचे दुकान सर्व ओस पडतील . त्याचबरोबर मालवाहू, रिक्षावाले , टेम्पोवाले यांचे धंदे जातील. असे जर मार्केट कमिटीच्या विचाराधीन असेल तर निश्चितपणे शहरातील जनतेचा विचार घेऊनच असा काही निर्णय घ्यावा. जर असे काय विचारात नसेल तर जनतेला आनंदच आहे. म्हणून शहरातच हे सर्व राहो यासाठी नगरपालिकेने गाव कसं वाढेल ,सहकारी संलग्न शासकीय संस्था, जवळच्या संस्था यांना कशाप्रकारे चांगले काम करून मदत करता येईल याचा विचार इथून पुढे तरी स्वतःहून जनतेसाठी गावाच्या विकासासाठी चलनवाढीसाठी नगरपालिकेने करावा. कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट कमिटीचे व्यवस्थापक व सर्व संचालक मंडळ आल्यापासून शेतकऱ्यांचे हिताचे , बैल बाजार येथे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी चांगले काम ते करत आहेत.
तसेच शहरातील प्रत्येक सोमवारी बाजारतळ येथे भरणारा सोमवारच्या दिवशीचां बाजार भाजीपाला फळवाले विक्रेते यांना चिखलाचा त्रास होऊ नये यासाठी काय करता येईल याची उपायोजना नगरपालिका करावी. जेणेकरून नागरिकांबरोबर विक्रेत्यांनाही त्रास होणार नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!