

कोपरगाव प्रतिनिधी
जेऊर कुंभारी येथील आरपीआय (आठवले)शाखा प्रणित भीम साम्राज्य सेना मित्र मंडळाचा तिसरा वर्धापन दिन जिल्हा परिषद शाळा गिरमे वस्ती येथील विद्यार्थ्यांना वही,पेन,पेन्सिल, खोडरबर आदी शालेय वस्तूंचे वाटप करून साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना भीम साम्राज्य सेनेचे संस्थापक प्रदीप गायकवाड म्हणाले की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आपण स्थापन केलेल्या या संघटनेला आज सर्व सभासदांच्या साथीने तीन वर्ष पूर्ण होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मानव कल्याणाचा मंत्र देऊन शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. म्हणूनच संघटनेने वर्धापन दिनानिमित्त इतर कार्यक्रम न करता विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करावे हा ठराव संघटनेच्या सर्व सदस्यांनी केला. शिवाय वाढदिवशी हार तुरे व इतर मोठे कार्यक्रम टाळून तालुक्यातील सर्वच गावातील विद्यार्थ्यांना ज्यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने वह्या व इतर शालेय साहित्यांचे वाटप करण्यात येते ते संघटनेचे मार्गदर्शक तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष , शिक्षणप्रेमी,मा.बिपिनदादा शंकररावजी कोल्हे साहेब यांचा आदर्श देखील आजच्या युवा पिढीला प्रभावित करणारा आहे. तसेच संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त कोपरगाव तालुक्याचा प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे, युवानेते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे, संघटनेचे आधारस्तंभ आरपीआय राज्य सचिव दिपकराव गायकवाड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती उपाध्यक्ष बाबुरावजी काकडे, आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे, तालुकाध्यक्ष अनिल भाऊ रणनवरे संघटनेचे मार्गदर्शक भास्करराव वाकोडे आदी मान्यवरांनी तसेच ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या असल्याचे गायकवाड यांनी सांगितले तर माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण संघटनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना संघटनेचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. यावेळी संजय वक्ते, प्रभाकर अंबिलवादे, दामोदर गायकवाड,आनंदा चव्हाण, भीमराव वरशिळ, गौतम खरात,साईनाथ वायकर आदी ग्रामस्थांसह संघटनेचे कार्याध्यक्ष सुमित पगारे, अध्यक्ष सागर गायकवाड, उपाध्यक्ष दाविद धीवर, सागर जगताप, संघटक स्वप्निल भालेराव,निलेश शिंदे, सचिन गायकवाड, आकाश साळवे, अमोल जगताप ,सोमेश्वर गायकवाड, अवि पगारे, रवी पवार यांचे संघटनेचे सभासद उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकात साळुंखे सरांनी संघटनेच्या कार्याची माहिती देताना त्यांचे सामाजिक कार्य उपयुक्त असल्याचे सांगितले तसेच श्री. ढुमने सर यांनी आपल्या उत्कृष्ट फलक लेखनातून शुभेच्छा दिल्या. तर शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले. आकाश साळवे यांनी आभार व्यक्त केले.


