Friday, April 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedभरपूर पाउस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे आ. आशुतोष काळेंचे विठूरायाला...

भरपूर पाउस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे आ. आशुतोष काळेंचे विठूरायाला साकडे!!

कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव मतदार संघासह सर्वत्र भरपूर पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी होवू दे असे साकडे आ. आशुतोष काळे यांनी विठूरायाला घातले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव बेट भागातील श्री काशी विश्वेश्वर, श्री शुक्लेश्वर व परमपूज्य राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी महाराज तसेच कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आषाढी एकादशी उत्सवात सहभागी होवून विठुरायाची महाआरती केली. त्यावेळी विठुरायाच्या चरणी त्यांनी प्रार्थना केली. प.पू. संत श्री रमेशगिरीजी महाराज यांचे आशिर्वाद घेतले.कोपरगाव मतदार संघात पावसाचे आगमन उशिरा झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता काहीशा वाढल्या होत्या. अधून मधून पावसाच्या सरी कोसळत असून पिकांना जीवदान मिळाले असले तरी अजूनही पावसाने सरासरी ओलांडलेली नाही. त्यामुळे बळीराजाच्या चिंता मिटलेल्या नाहीत. त्यामुळे पांडुरंगा भरपूर पाऊस पडू दे व बळीराजा बरोबर सर्व मायबाप जनता सुखी होवू दे असे साकडे आ. आशुतोष काळे यांनी भगवान पांडुरंगा चरणी घातले. यावेळी कोपरगाव शहरात नरसिंह प्रतिष्ठाण ट्रस्ट व परमवीर ग्रुप यांच्या वतीने आयोजित आषाढी एकादशी उत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून श्री विठ्ठलाची आरती केली व भाविकांना ‘फराळ’ वाटण्याची सेवा देखील केली.यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
आषाढी एकादशीनिमित आ. आशुतोष काळे यांनी विविध मंदिरात पूजा करून महाआरती केली व भाविकांना खिचडी फराळ वाटप केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!