
जेऊर कुंभारी वार्ताहर
जेऊर पाटोदा येथे दि २७ डिंसेबर पासुन श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदीर वर्धापन दिना निमित्ताने अंखड श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायणाचे मोठ्या उत्साहात सुरुवात होवुन आज दिंनाक ३ डिसेंबर २०२३ रोजी कार्लाच्या किर्तनाने ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भागवत कथा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्याचे बिपिनदादा कोल्हे साहेब यावेळी उपस्थित होते.ह.भ.प.श्रीराम महाराज गाडेकर यांच्या मधुर वाणीतून भागवत कथा संपन्न झाली.या भागवत कथेत रुक्मीनी स्वयवर, कृष्ण रासलिला ह्या. झाकी स्वरुपात बाल गोपालांनी देखावे सादर केले.त्रिषा अमोल नागरगोजे या कुमारिकेने राधेची भुमिका तर वृषाली रोठे या कुमारिकेने श्रीकृष्णाची भूमिका साकरली.याच बरोबर रास लिलामध्ये वृंदावनी ताई मोरे,किर्ती केकाण,आराध्या रोठे,खुशी गरुड, अपूर्व नितिन जाधव,संस्कृती गरुड,यांनी सहभागी नोदवुन विविध देखावे सादर करुन भक्तीमय वातावरण निर्माण केले.कालेच्या कीर्तन.ह.भ.प.श्रीराम महाराज गाडेकर यांच्या समुधुर वाणीतून संपन्न झाले.यांना संगीताची साथ संगत करणारे ह.भ.प.नवनाथ महाराज खेडकर,ह.भ.प.अरुण महाराज पगारे. ह.भ.प.नंदु महाराज,पंडित महाराज,विलास महाराज,लक्ष्मण महाराज मळेगावकर,ह.ब.प.सोपान महाराज बारहाते,ह.भ.प.भिमराज महाराज जाधव,चांदगव्हाण भजनी मंडळ, लक्ष्मीनगर विजय मारुती भजनी मंडळ,गांधीनगर भजनी मंडळ,दत्तनगर भजनी मंडळ,जेऊर पाटोदा भजनी मंडळ,आव्हाड वस्ती भजनी मंडळ,आदिंनी साथ संगत करुन कार्लाच्या किर्तनाचे रंगत वाढविली. यावेळी भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले होते.माऊ माऊली ताई साहेब लक्ष्मी रुपाने येवून व देव माणुस बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते माय माऊली मंगल कार्यालय लोकार्पण करुन ह.भ.प.परम पुज्य नवनाथ महाराज. खेडकर यांच्या कडे मंगल कार्यालय स्वाधीन करण्यात आले.या प्रसंगी ग्रंथ दिंडीचे देखील मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले.ग्रंथ. मिरवणुक काढत अश्वरिंगण करत हा सोहळा साजरा करण्यात आला.हा सप्ताह पूर्ण यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली असे आश्रमातील ह.भ.प.नवनाथ महाराज खेडकर, माजी.सभापती मच्छीद्र नाना केकाण,महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक सतिश आव्हाड, माजी सरपंच विठ्ठलराव आव्हाड, विलास आव्हाड, खजिनदार कैलासजी सानप,माजी माजी सरपंच सतिषजी केकाण ,सरंपच मनीषा सतिष केकाण, सोपान केकाण,सुनिल केकाण, बाळु नाना भाबड,किशोर नाना भाबड,रमेश अण्णा केकाण, चंदू अण्णा सानप,सचिन गिते,विलास आव्हाड , जालिदंर गरुड,कृष्णा बोरवके मुरलीधर वायकर,याच बरोबर प्रमुख सेवेकरी सुभाष नाना नागरे,ताराबाई काकु गरुड,व्दारकाताई नागरगोजे यांनी हा कार्यक्रम रात्र दिवस मेहनत घेवुन हा कार्यक्रम यशस्वी केला तसेच आश्रमातील विलास जेजुरकर,गणेश आव्हाड,कृष्णा रोठे,ज्ञानेश्वर घुगे,नारायण देसाई,चैतन्य जाधव, साई माळी,विकास जाधव,गौरव दाणे,आकाश गुंडगळ,शुभम शिर्के,आदित्य आंधळे,आदित्य वक्ते,सचिन राजगुरु,अंबोरे मामा,सचिन पवार यांनी देखील परिश्रम घेवुन हा कार्यक्रम यशस्वी केला आहे. महाप्रसादासाठी विनामूल्य सहकार्य .करुन आचारी भाऊसाहेब गंगावणे यांनी सेवा केली.या प्रसंगी महाप्रसाद भंडारा संपन्न झाला.या महाप्रसादासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.किरण केकाण यांनी विनामूल्य १२ ही महिने पाण्याचे जार देवुन सेवा करतात.कार्लाच्या प्रसंगी विलास रंगनाथ आव्हाड यांनी जारच्या पाण्याची व्यवस्था करुन सेवा केली.नितिन पाटील सांगळॆ यांच्यासह सर्व पाण्याचे टँंकर वाल्यांनी पाणी पुरवुन सेवा दिली आहे. अशा पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला.


