Sunday, April 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedपाईपलाईनचे काम पूर्ण होतात पेव्हर ब्लॉक बसण्याचे काम सुरू होणार !!- अनिरुद्ध...

पाईपलाईनचे काम पूर्ण होतात पेव्हर ब्लॉक बसण्याचे काम सुरू होणार !!- अनिरुद्ध काळे प्रसिद्धीसाठी काहींची उगाचच उठाठेव सुरू

कोपरगाव प्रतिनिधी

सुभद्रानगर मध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार कोपरगाव नगरपरिषदेकडून नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असून हे काम पूर्ण होतात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम देखील तातडीने सुरू होणार आहे हे सुभद्रा नगरच्या नागरिकांना माहित आहे. मात्र एक माजी नगरसेवक पाच वर्षात हरवला असून दुसऱ्याची मात्र प्रसिद्धीसाठी उठाठेव सुरू असून त्यांनी सुजाण जनतेला वेड्यात काढण्याचे उद्योग बंद करावे असा टोला राष्ट्रवादीचे अनिरुद्ध काळे यांनी माजी नगरसेवकाला लगावला आहे.
अनिरुद्ध काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की,
सुभद्रानगर मधील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन खराब झाल्यामुळे नागरिकांना पाणी पुरवठा होत नव्हता.त्याची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला नवीन पाईपलाईन टाकण्याच्या केलेल्या सूचनेनुसार पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.अगोदर पेव्हर ब्लॉक टाकायचे व पुन्हा पाईपलाईनचे कामासाठी पेव्हर ब्लॉक काढणे संयुक्तिक नाही त्यातून निधीचा अपव्यय होवून हा निधी जनतेच्या करातून जमा झालेला आहे. त्यामुळे या निधीचा पर्यायाने जनतेच्या पैशाचा योग्य विनियोग होण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद पाईपलाईनचे काम पूर्ण होतात पेविंग ब्लॉक बसण्याचे काम सुरू करणार आहे.त्याबाबत वर्क ऑर्डर देखील देण्यात आली याची सुभद्रानगरच्या नागरिकांना माहिती असतांना काहींना आपली खालावत चाललेली राजकीय प्रतिमा उजळविण्यासाठी नागरिकांना वेड्यात काढीत आहेत.त्यापेक्षा त्यांनी सुभद्रानगर मध्ये विकास कामांचे भूमिपूजन होवून वर्षभरानंतर काम सुरू केले व रस्त्यावर खडीकरण झाल्यावर आठ महिन्यांनी डांबरीकरण केले त्याचा नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागला त्याबाबत त्यांनी खुलासा नागरिकांना द्यावा.मात्र पाईपलाईनचे काम पूर्ण होतात पेविंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरू होेणार असतांना आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी नागरिकांना वेड्यात काढू नका.सदरच्या पेव्हर ब्लॉक टाकण्याच्या कामाची वर्क ऑर्डर प्रसिद्ध झाली आहे त्याची माहिती मिळताच हे महाशय जागे झाले त्यामुळे प्रसिद्धीसाठी ते बातम्या प्रसिद्ध करीत आहेत.ज्यांनी मागील पाच वर्षात दोन दोन वर्ष विकास कामे लांबवली त्या कामांचा आ.आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून ती कामे पूर्ण करून घेतली त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. ज्यांच्यामुळे नागरिकांना मागील पाच वर्ष सातत्याने अडचणींचा सामना करावा लागला त्यांचा प्रसिद्धीसाठी आटापिटा सुरू असून ते जनतेला वेड्यात काढत आहे असा टोला अनिरुद्ध काळे यांनी लगावला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!