
जेऊर कुंभारी वार्ताहर
खादी ग्रामोद्योग संघाच्या निवडणुकीत बहुमताने विजयी झाल्याबद्दल आर पी.आय राज्य सचिव समाजभुषण दिपकराव गायकवाड यांचा कोपरगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना क्रांतीवीर लहुजी टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शरद त्रिभुवन म्हणाले की, समजासाठी अहोरत्री आणि निःपक्षपातीपणे काम करण्याच्या वृत्तीमुळेच दिपकराव गायकवाड हे आजवर ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य तसेच यापूर्वी खादी ग्रामोद्योग संघाच्या व्हा.चेअरमन पद असे विविध पदांवर मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.त्यांनी आपल्याला मिळालेल्या पदाचा समाजासाठीच वापर केला तर अनिल पगारे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन दिपकराव गायकवाड यांचा सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना दिपकराव गायकवाड म्हणाले की, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे, युवानेते विवेकभैय्या कोल्हे, प्रगती विकास मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव वक्ते यांचे मार्गदर्शनाखाली झालेल्या कोपरगाव तालुका विविध कार्यकारी सह.ग्रामोद्यग संघाच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी प्रगती विकास मंडळाचे सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. यापुढें खादी ग्रामोद्योग संघाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगताना सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी क्रांतीगुरू सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष अनिल पगारे, शरद त्रिभुवन, शंकर बिऱ्हाडे, रवी डोलारे,आर पी आय तालुका अध्यक्ष अनिल रणवरे, महेश पंडोरे , शामराव आहेर, सोमनाथ ताकवले, अमोल पगारे, गोरख देवडे,रोहित घोरपडे, सुमित पगारे, प्रदिप गायकवाड, सचिन खोलसे,अजय गोरसे, साईनाथ जाधव आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.


