
कोपरगाव प्रतिनिधी
आज दि.११/१०/२०२२ रोजी कोकामठाण येथे कृषी विभाग यांच्या उपक्रमातून सोयाबीन शेतीशाळा शेतकरी दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेतीदिनाच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना ही प्रेरणा मिळावी हा या शेतिदिनाचा उद्देश आहे.शेतीशाळा प्रशिक्षणामुळे उत्पादनात वाढ होते,तसेच शेतकरी स्वतःचे निर्णय घेण्याच्या क्षमता वाढीस लागते.शेतीशाळा या उपक्रमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी पंधरवड्यात एक वर्ग आयोजित करण्यात येतो. कोकामठाण येथे मुळ्यसाखळी योजनेअंतर्गत श्रीमती निर्मला सोनवणे यांच्या मार्गदर्शनातून सोयाबीन प्रकल्पाच्या ४ शेतीशाळा सुरू होत्या त्याची सांगता शेतिदिनाच्या माध्यमातून सर्व शेतीशाळा सभासद शेतकरी एकत्र येऊन झाली.सोयाबीन पिक माती परीक्षण पासून ते काढणी तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण घेण्यात आले. त्यातून शेतकऱ्यांना जैविक सेंद्रिय शेती याबाबत जागरूकता निर्माण करून खते औषधे याबाबत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन शिकविले जाते. या कार्यक्रमाबरोबरच रब्बी पिकांच्या उत्पादन वाढ प्रामुख्याने हरबरा या विषयावर कृषी अधिकारी श्री.विशाल साबदे यांनी सखोल मार्गदर्शन केले.तसेच कांदा पिकावर बायर अग्रो चे स्वप्निल पाटील यांनी चर्चात्मक मार्ग दर्शन केले. सूक्ष्म सिंचन या विषयावर जाधव साहेब यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी खोरे केन ट्रांन्सपोर्ट कार्यकारी संचालक दिलीपराव शिंदे उपस्थित होते.तसेच कोकामठाण येथील उपसरपंच दिपक रोहम ,प्रगतशील शेतकरी नवनाथ वक्ते,कृषी पर्यवेक्षक संजय घणकुटे, कोकामठाण येथील कृषी अधिकारी श्रीमती निर्मला सोनवणे हे उपस्थित होते.तसेच कोकामठाण येथील आत्मा अंतर्गत असणारे कृषी गटातील सर्व शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


