Thursday, April 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedसमताच्या राहाता शाखेच्या ठेवीत तब्बल २७ टक्क्यांनी वाढ!! - श्री मिलिंद बनकर,...

समताच्या राहाता शाखेच्या ठेवीत तब्बल २७ टक्क्यांनी वाढ!! – श्री मिलिंद बनकर, शाखाधिकारी

कोपरगाव प्रतिनिधी


महाराष्ट्रात समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या १६ शाखा आहे. ३० सप्टेंबर २०२२ अखेर अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शाखेत ठेवी,कर्ज, सुरक्षित सोनेतारण कर्जामध्ये लक्षणीय वाढ झाली असून राहाता तालुक्यातील सर्वच वयोगटातील सभासदांना समताच्या योजना आणि उपक्रमांची माहिती करून देत संस्थेची मूल्ये आणि दृष्टीकोनांप्रमाणे अविरतपणे सेवा देण्याचे काम करत आहे.राहाता शाखेची स्थापना ११ मे १९९६ रोजी करण्यात आली.आज राहता शाखेला २६ वर्ष पूर्ण झाली असून वर्षानुवर्ष या शाखेची आर्थिक घोडदौड सुरु आहे. ३० सप्टेंबर २०२२ अखेर राहाता शाखेच्या ठेवी ६५ कोटी ८८ लाख इतक्या झाल्या असून ठेवींमध्ये वार्षिक सरासरीने तब्बल २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गत ६ महिन्यात राहाता शाखेच्या ठेवींमध्ये ७ कोटी ३७ लाख रुपये इतकी वाढ झाली आहे.एकूण कर्ज वाटप २७ कोटी १८ लाख रुपये केले आहे. सुरक्षित सोनेतारण कर्जामध्ये देखील राहाता शाखेने विशेष उच्चांक गाठला असून १२ कोटी ११ लाख रुपयांचे सोनेतारण कर्जाचे वाटप केले असल्याची माहिती राहाता शाखेचे शाखाधिकारी श्री.मिलिंद बनकर यांनी दिली.
शाखेतील अत्याधुनिक सुविधांविषयी अधिक माहिती देताना शाखेचे सोनेतारण अधिकारी श्री प्रवीण गमे म्हणाले की, राहाता शाखेद्वारा जेष्ठ नागरिकांना घरपोहोच पेन्शन सुविधा, लाॅकर सुविधा, मोबाईल बॅकींग,आर.टी.जी.एस, एन.ई.एफ.टी.,आय.एम.पी.एस.,क्यु. आर.कोड सुविधा,व्हाऊचरलेस बँकिंग प्रणाली, एस.एम.एस.यांसारख्या विविध सुविधा आणि योजना  ग्राहक,सभासदांना देण्यात येत आहे.
समाजातील प्रत्येक व्यक्तींना पत निर्माण करून देत त्यांना आर्थिक स्थिरता प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात समता नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना ११ मे १९८६ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या ठिकाणी करण्यात आली.त्यानंतर बदलत्या काळानुसार समताच्या १६ शाखांच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सभासद हित जोपासत अविरतपणे सेवा देण्याचे काम केले जात आहे.
राहता शाखेच्या या आर्थिक  घोडदौडीमध्ये समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे,व्हा.चेअरमन सौ.श्वेता अजमेरे, संचालक श्री.गुलाबचंद अग्रवाल, श्री.जितूभाई शहा, श्री. अरविंद पटेल, श्री.चांगदेव शिरोडे, श्री.कचरू मोकळ, श्री.रामचंद्र बागरेचा, श्री.संदीप कोयटे, श्री. गुलशन होडे, श्री.निरव रावलिया, संचालिका सौ.शोभा दरक,जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड यांच्या मार्गदर्शनाखाली राहता शाखेचे शाखाधिकारी श्री.मिलिंद बनकर, सोने तारण अधिकारी श्री.प्रवीण गमे, श्री. शुभम शेंडे आणि कर्मचारी यांचा विशेष सहभाग आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!