Wednesday, July 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedडॉ. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्यायाची चळवळ अधिक बळकट होणार!!- दिपकराव...

डॉ. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्यायाची चळवळ अधिक बळकट होणार!!- दिपकराव गायकवाड

जेऊर कुंभारी वार्ताहर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे राज्य सचिव दिपकराव गायकवाड यांनी सांगितले की, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री यांच्या अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली असून, सामाजिक न्यायाच्या चळवळीला अधिक बळ मिळणार आहे.
अहिल्यानगर दौऱ्यादरम्यान कोपरगाव तालुक्याच्या वतीने डॉ. आठवले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना दिपकराव गायकवाड म्हणाले, “डॉ. रामदास आठवले साहेबांचे नेतृत्व हे वंचित, शोषित आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पक्षाची संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, कोपरगाव तालुक्यात पक्षवाढीसाठी व्यापक जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे.”
यावेळी आरपीआयचे कोपरगाव तालुका अध्यक्ष अनिलभाऊ रणनवरे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात, राष्ट्रीय सचिव अविनाशजी महातेकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, राज्य उपाध्यक्ष विजयरावजी वाकचौरे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांतजी भालेराव, युवक जिल्हाध्यक्ष पप्पूभाऊ बनसोडे, राज्य नेते कैलासरावजी शेजवळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिपकराव गायकवाड यांनी पुढे सांगितले की, डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय, संविधानिक मूल्यांचे रक्षण आणि सर्वसमावेशक विकासासाठी पक्षाची वाटचाल अधिक वेगाने सुरू राहील. या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक वाढविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!