
कोपरगाव प्रतिनिधी
शहरात नगरपालिकेच्या ने चालु आर्थिक वर्षात घरपट्टीत आकारणीत वाढ केली आहे तरी हि घरपट्टी रद्द करावी व पूर्वीप्रमाणे घरपट्टी आकारावी.तसेच शहरात ठिकठिकाणी त्वरित दिशा दर्शक फलक बसवावे या सह विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २७ सप्टेबर २०२२ रोजी नगरपरिषदचे अधिकारी चाकणे यांना निवेदन देण्यात आले
..यावेळी माजी जिल्हाध्यक्ष शरद खरात, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव रनशूर, पैहिलवान साईनाथ जाधव, विजय जाधव, संजय कोपरे, नारायण पगारे, संजय त्रिभुवन, नानासाहेब जगताप, विजय कसलीवाल, पवन पंजाबी, चंद्रकांत पगारे, सुनील मोकळ,निलेश मगर तसेच महिला आघाडीच्या मंगलताई पगारे, करिष्मा निकम, रंजनीताई लासे, अश्वीनीताई भड , पूजा जमधडे इत्यादी कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.
यावेळी शरद खरात,नानासाहेब जगताप, विजय कसलीवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले
मा.जिल्हाध्यक्ष शरद खरात बोलताना म्हणाले कि कोरोनाचा खडतर काळ तसेच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरीकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे या पाश्र्वभूमीवर नगरपरीषदेने स.न.२०२२-२३या आर्थिक वर्षातील वाढीव घरपट्टी रद्द करून नागरीकांना दिलासा द्यावा तसेच शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. कोपरगाव शहरात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या भागातुन घरपट्टी व पाणीपट्टीबाबत नागरीकांच्या तक्रारी आहेत तरी नगरपरिषदेने योग्य तेवढीच पाणीपट्टी घ्यावी तसेच कोपरगाव शहरात ठिकठिकाणी दिशादर्शक फलक बसवावे अशी मागणी खरात यांनी यावेळी केली.


