
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावचे माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण यांची सरपंच महासंघाच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी निवड झाली ही जेऊर कुंभारी गावासाठी अभिमानाची बाब आहे. आपले काम प्रामाणिक असेल तर यश निश्चित मिळत असते. अहमदनगर जिल्हा बॅकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी गावच्या विकासासाठी तरुणांनी संघटीत व्हावे असे आवाहन केले आहे. त्यांच्या अवाहनास प्रतिसाद देत जालिंदर चव्हाण यांनी आपल्या सामाजिक कार्यातून एक वेगळाच ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पारनेर तालुक्यातील आमदार निलेश लंके यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.चव्हाण यांनी त्यांच्या सामाजिक कार्यातून जेऊर कुंभारी गावची मान उंचावली आहे असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष सुधाकर वक्ते यांनी केले. यावेळी भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष सुधाकर वक्ते, शिवसूत्र युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल गुरसळ, ग्रा.प. सदस्य प्रदीप गायकवाड, राहुल वक्ते, राहुल चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. या सत्काराला उत्तर देताना चव्हाण म्हणाले की मी आपल्या सत्काराने भारावून गेलो असून आपल्या सहकार्याने गावच्या विकासात नेहमी अग्रेसर राहील असे आश्वासन दिले.
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष सुधाकर वक्ते, शिवसूत्र युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल गुरसळ, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड, तुषार गुरसळ, राहुल वक्ते, राहुल चव्हाण, राणा वक्ते, राहुल देवकर, रोहित जावळे, ऋषीकेश वक्ते, ऋषी गुरसळ, ऋषीकेश मेहेत्रे, साईनाथ वायकर, अक्षय गुरसळ,चैतन्य जावळे, राहुल देवकर, सुदर्शन कवडे, विकी जगताप, विक्रम चव्हाण, किरण चव्हाण, अथर्व गिरमे ,खंडू
गांगुर्डे ,सागर गांगुर्डे, सौरव पवार गौरव पवार, रितेश गायकवाड ,तेजस वक्ते ,अनिल सूर्यवंशी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.


