

कोपरगाव प्रतिनिधी
जेऊर कुंभारी उपसरपंच जालिंदर रावसाहेब चव्हाण यांची अखिल भारतीय सरपंच महासंघच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी कोरोना महामारीच्या काळत स्वताच्या जीवाची पर्वा न करता जेऊर कुंभारी उपकेंद्रत लसीकरण सुविधा उपलब्ध करून सर्व नागरिकांना लसीकरण मिळावे यासाठी नेहमी सतर्क असत.
अहमदनगर जिल्हा बॅकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जेऊर कुंभारी गावतील नागरिकांच्या येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्न ,जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीच्या माध्यामातुन घरकुलासाठी येणाऱ्या समस्या सोडवणे, गावातील तरुण वर्गला हाताशी धरून जेऊर कुंभारी
गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण , शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा, सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच पुढे असणे गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावणे,पौराणिक मंदिर परिसर स्वच्छ करणे, गुणवंत विद्यार्थींचा गौरव करणे,गावातील रस्ते दुरूस्ती करण्यासाठी रास्तारोको आंदोलन ,असे अनेक समाजीक कामे त्यांच्या हातून झाली आहे
ग्रामीण चळवळीतील विकासाची साथ देण्यासाठी पंचायत राज मधील ग्रामपंचायत स्तरावरील सर्व प्रश्न समस्या मार्गी लावण्यासाठी
आज त्यांना अखिल भारतीय सरपंच महासंघचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
विनोद किशोर वहाडणे यांच्या हस्ते अखिल भारतीय सरपंच महासंघच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी जालिंदर रावसाहेब चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या या निवडी बद्दल जेऊर कुंभारी पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे व त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षीव होत आहे.



