


कोपरगाव प्रतिनिधी
शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये नेत्रदीपक, नयनरम्य व अद्भूत असा जन्माष्टमीचा सोहळा संपन्न झाला . राधा – कृष्ण व बालगोपाळांच्या वेशभूषेत आलेले चिमुकले , ‘ गोविंदा रे गोपाळा ‘ गाण्याच्या तालावर डोलणारे विद्यार्थी यामुळे शालेय प्रांगणात जणू गोकुळ नगरीच अवतरली होती . या प्रसंगी श्रावणी कांगुणेकर, पुष्कर उदावंत या विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील प्रसंग हुबेहूब आपल्या भाषणातून मांडले . श्यामसुंदर गव्हाणे सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी समुहगीत सादर केले तर मोनाली होन यांच्या मार्गदर्शनाखाली नववीच्या विद्यार्थीनींनी बहारदार नृत्याविष्कार सादर केला . पाळण्यातील बालकृष्णाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले . याच प्रसंगी दहीहंडी देखील फोडण्यात आली या वेळी विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला . काल्याचा प्रसादही विद्यार्थ्यांना वाटण्यात आला . तर एक आदर्श म्हणून आपण भगवान श्रीकृष्णांना जाणून घेतले तर नक्कीच आपले जीवनही यशस्वी व सार्थकी होईल असे वक्तव्य प्राचार्य सुरेश शिंदे यांनी केले . अशा प्रकारे संगीत, नृत्य यामुळे विद्यार्थ्यांबरोबर वातावरणातही आनंदाचे उधाण आले होते . अशा या जल्लोषाने युक्त कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिक्षा गंगवाल, वैष्णवी गव्हाणे या विद्यार्थीनींसह नंदिनी वक्ते यांनी केले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कला शिक्षक दत्ता डोखे , राहूल कोळगे , दिपक वक्ते , मोनाली सुराळे या शिक्षकांनी विशेष कष्ट घेतले . कार्यक्रमाच्या नेत्रदीपक साजरीकरणाबद्दल विश्वभारती रूरल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मा .कांतीलालजी आग्रवाल, सचिव – संजयजी नागरे, विश्वस्त – मनोजशेठ आग्रवाल, आनंदजी दगडे , वनिताताई नागरे , कार्यकारी संचालक आकाश नागरे ,
उपप्राचार्य – सोमनाथ सोनवणे, प्रविण कदम, प्रशांत भास्कर यांनी कौतुक करून सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या .


