
कोपरगाव प्रतिनिधी
या वर्षी १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस आपल्या संपुर्ण भारत देशात विशेष पद्धतीने साजरा केला गेला. या वर्षी आपला देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पुर्ण झालीत. त्यामुळे हे वर्ष “अमृत महोत्सव ” म्हणुन साजरे केले गेले. या अमृत महोत्सव प्रसंगी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी देशाच्या समस्थ जनतेला ” हर घर तिरंगा ” अभियान हा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले व जनतेने देखील या अभियानाला चांगला प्रतिसाद दिला.
महारुद्रा फाऊंडेशन चे शशिकांत रामभाऊ वक्ते व अमोल विलास राऊत यांनी महारुद्रा फाऊंडेशन तर्फे जेऊर कुंभारी गिरमे वस्ती (ZP) शाळेला विद्यार्थ्यांच्या दररोजच्या परिपाठासाठी माईक व साऊंड सिस्टीम १५ ऑगस्ट (अमृत महोत्सव) निमित्ताने दिली.
तसेच महारुद्रा फाऊंडेशन चे श्री. गणेश भाऊसाहेब उगले (CA) यांनी महारुद्रा फाऊंडेशन तर्फे शामवाडी कोकमठाण (ZP) शाळेला विद्यार्थ्यांसाठी LED TV शाळा डिजिटल व्हावी या हेतूने शाळेला दिला.
मी सागर चव्हाण फाऊंडेशन चा सचिव या नात्याने फाऊंडेशन च्या सर्व कार्यकारी मंडळाचे आभार मानतो व हर घर तिरंगा अभियान सारखे अनेक उपक्रम महारुद्रा फाऊंडेशन भविष्यात समाजासाठी राबवेल व ते पूर्णत्वास नेईल याबद्दल अश्वस्थ करतो.


