
कोपरगाव प्रतिनिधी
आज दिनांक ११ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिकशाळा जेऊर कुंभारी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वराज्य महोत्सव घरोघरी तिरंगा फडकलाच पाहिजे , स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा विजय असो या घोषणा देत उपक्रमांतर्गत गावातून जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली . पालकांना घरोघरी तिरंगा फडकवावा यासंदर्भात जनजागृती करण्यात आली .त्यांचीशी संवाद साधण्यात आला .स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे घरोघरी तिरंगा घोषणा देऊन स्वागत करण्यात आले . विद्यार्थ्यांनी वेगवेगळी वेशभूषा परिधान करून हर घर तिरंगा चे स्वागत केले.या वेळी सरपंच सुवर्णा पवार, संजीवनी कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, ग्रामपंचायत सदस्य गंगुबाई जाधव, महेंद्र वक्ते, नानासाहेब गुरसळ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य किशोर वक्ते , ग्रामसेवक रणछोड, संतोष बोरावके, मुख्याध्यापक श्रीकांत साळवे सर तसेच शिक्षिका श्रीम. वंदना पर्वत, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


