
भीमसाम्राज्य सेना मित्र मंडळाचा वृक्षसंवर्धनाचा कौतुकास्पद उपक्रम!!
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगांव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे आर पी आय शाखेचे भीमसाम्राज्य सेना मिञमंडळाचा पहिला वर्धापन दीन मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक करतांना भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे संस्थापक व ग्रामपंचायत सदस्य प्रदिप गायकवाड यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे व सर्वच महापुरुषांच्या विचारांना आदर्श मानून आर पी आय चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय समाजकल्याण न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन कोपरगांव तालुक्याचे युवा नेते मा.विवेकभैय्या कोल्हे साहेब यांचे हस्ते, आर पी आय चे प्रदेश सचिव समाजभूषण दिपकराव गायकवाड व स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुरावजी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आर पी आय चे युवा जिल्हाअध्यक्ष पप्पु भाऊ बनसोडे, युवा नेते नाना भाऊ त्रिभुवन यांचे उपस्थीत एक वर्षापूर्वी आर पी आय शाखा भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे उद्घाटन करण्यात आले होते. आज संघटनेला एक वर्ष पूर्ण होत असून वर्षभरामध्ये संघटनेने सर्वच महापुरुषांच्या जयंती मोठया उत्साहाने साजरी करून महामानवांचे विचार मनामनात रुजावे यासाठी प्रयत्न केले, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ्ता मोहीम राबवून आपली सामजिक जबाबदारी राखलीआहे. तर युवानेते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. साखर कारखान्याचे चेअरमन मा.विवेकभैय्या कोल्हे साहेब,व्हा.चेअरमन रामेशजी घोडेराव युवक जिल्हाअध्यक्ष पप्पु भाऊ बनसोडे,कोपरगांव तालुका अध्यक्ष जितेंद्र रणशुर, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सुधाकर वक्ते यांनी संघटनेला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या असल्याचे प्रदिप गायकवाड यांनी सांगितले.
प्रसंगी संघटनेचे मार्गदर्शक आर पी आय चे प्रदेश सचिव दिपकराव गायकवाड व स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुराव काकडे यांच्या हस्ते संघटनेच्या फलकाचे पूजन करण्यात आले तर सरपंच सुवर्णा ताई पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण केला. यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, सतीश आव्हाड, माजी जिल्हा परिषद सदस्य दिपकराव गायकवाड,माजी सभापती शिवाजी वक्ते, माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण आदि मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करून सर्व सदस्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थीत सर्व प्रमुख मान्यवरांसह अशोकराव राऊत, ग्रामपंचायत सदस्य गंगुबाई जाधव, मंदाताई वाकोडे, पर्वताबाई काकडे, संजय भालेराव, किसन गायकवाड,दिलीप काकडे, संजय आव्हाड,नामदेव गायकवाड, किशोर आबा गायकवाड, चांगदेव गायकवाड,शिवराम गायकवाड, अशोक पोटे, सुधाकर दिवे, किशोर खरात, धिरेन गायकवाड किसन आहीरे , गोकुळ जाधवआदि मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. केवळ वृक्षारोपण न करता लागवड केलेल्या वृक्षांची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून सदर वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी संघटनेचे सदस्य स्वीकारतील अशी ग्वाही संघटनेचे कार्यध्यक्ष सुमित पगारे यांनी दिली. यावेळी आर पी आय शाखा भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे अध्यक्ष सागर गायकवाड, उपाध्यक्ष दावीद धीवर, अमोल काकडे, सूरज चव्हाण, सचिन गायकवाड,अवि पगारे, सोमेश्वर गायकवाड, गोपी गायकवाड, पिलू गायकवाड,स आकाश साळवे, सार्थक वायकर, गोकुळ अहिरे, धीरज आव्हाड, भारत गायकवाड, महेश गायकवाड, भारत गायकवाड, गौरव गायकवाड, प्रशांत केकान, राणा वक्ते आदी सदस्य उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जगताप यांनी तर आभार प्रविण गायकवाड यांनी व्यक्त केले.


