
कोपरगाव प्रतिनिधी
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे थोर भारतीय नेते, भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार होते. लोकमान्य टिळक म्हणजे खर्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्य इतिहासातील एक धगधगता निखाराच. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करून त्यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. विलक्षण संघटनासामर्थ्य व कार्यशक्ती याद्वारे ते लोकनेते म्हणून उदयास आले. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच समाजात एकोपा निर्माण व्हावा यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली. लोकमान्य टिळकांनी जन्मभर विद्याव्यासंग, ग्रंथरचना आणि लोकजागृतिकारक अखंड लेखन केले. सर्वांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर सेनानी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव येथील टिळकनगर येथे त्यांच्या स्मारकास संजीवनी उद्योग समूह कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले, भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, वैभव आढाव, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, संदीप देवकर, विनोद राक्षे, गोपीनाथ गायकवाड, राजेंद्र बागुल, विजय चव्हाणके, प्रशांत कडू, खालीकभाई कुरेशी, इलियास खाटीक, अकबरलाला शेख, सतीश रानोडे, विशाल गोर्डे, शंकरराव बिऱ्हाडे, सागर कोपरे, रवी बागुल, रोहिदास पाखरे, आसिफ शेख, वासुदेव शिंदे, सचिन सावंत यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


