
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील पाझरतलाव व पाणी साठवण बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील २२ गावांसाठी मृद व जलसंधारण विभागाकडून ४ कोटी ५८ लाख ४३ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक पाणी पुरवठा योजनांना पाझर तलाव व साठवण बंधाऱ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठा उपयोग होत आहे. परंतु मागील काही वर्षापासून या पाझर तलाव साठवण बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रश्न अनुत्तरीत होता. त्याबाबत ना. आशुतोष काळे यांचा पाझर तलाव साठवण बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून मृद व जलसंधारण विभागाने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जवळपास २२ गावातील ३० पाझर तलाव साठवण बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ५८ लाख ४३ हजार रुपये निधी मंजूर केला आहे.
यामध्ये जवळके ४९.९८ लाख,रांजणगाव देशमुख ४४.८९, शहापूर ४०.८२ लाख, खोपडी २८.९२ लाख,येसगाव २५.२३ लाख, करंजी २४.२३ लाख, अंजनापूर १८.५५ लाख,अंजनापुर १८.१८ लाख, तिळवणी १६.८९, लाख, तिळवणी १५.८५ लाख,अंजनापुर १४.३८ लाख, उक्कडगाव १४.३६, उक्कडगाव १२.५६ लाख,करंजी बु. १३.४८ लाख, शिंगणापूर ११.८२ लाख, बहादरपूर ११.१९ लाख,जवळके ११.११ लाख, संवत्सर ११.०१ लाख, बहादराबाद १०.२४ लाख,तळेगाव मळे ९.७५ लाख, खिर्डी गणेश ७.३७ लाख,पढेगाव ७.२६ लाख,आपेगाव ७.१९ लाख, शिंगणापूर ६.५५ लाख, आपेगाव ५.५९ लाख, कोकमठाण ३.९६ लाख, कोकमठाण ३.२८ लाख,संवत्सर २.२६ लाख, पुणतांबा रस्तापूर ६.८९ लाख, वाकडी लांडगे वस्ती ४.५४ लाख आदी गावातील पाझर तलाव साठवण बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात आला आहे. अनेक वर्षापासूनचा अत्यंत जिव्हाळ्याचा व महत्वाचा प्रश्न ना. आशुतोष काळे यांनी मार्गी लावला असून चालू उन्हाळ्यात या पाझर तलाव साठवण बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होवून येणाऱ्या पावसाळ्यात अतिरिक्त पाणी साठले जावून त्याचा मोठा फायदा वरील गावातील नागरिकांना होणार असल्यामुळे या गावातील नागरिकांनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाला पाझरतलाव व पाणी साठवण बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळे ना. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख, पालक मंत्री ना. हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद अध्यक्षा ना. सौ.राजश्रीताई घुले यांचे आभार मानले आहे.


