Thursday, April 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedगंगा गोदावरीचा काठ अत्यंत पवित्र!!- रमेशगिरी महाराज

गंगा गोदावरीचा काठ अत्यंत पवित्र!!- रमेशगिरी महाराज

कोपरगाव प्रतिनिधी

             श्रीक्षेत्र कोपरगांव तालुक्यातील दक्षिणकाशि म्हणून गंगा गोदावरीला विशेष महत्व आहे. भारतभूमीतील सर्वात मोठी आणि दुस-या क्रमांकाची नदी म्हणून गंगा गोदावरीचा काठ अत्यंत पवित्र असुन गौतम ऋषींच्या प्रयत्नाने नाशिक जिल्हयातील त्रंबकेश्वर येथे तिचा उगम झाला आहे अशा या पवित्र गंगा गोदावरीच्या परिघामध्ये साईबाबाची शिर्डी वसली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मुख्य विश्वस्थ रमेशगिरी महाराज यांनी केले. तालुक्यातील श्रीक्षेत्र संवत्सर येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी गंगापुर तालुक्यातील कानडगांव येथील साई पायी पालखी दिंडीचे शुकवारी आगमन झाले होते त्याचे विधीवत पुजन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख विश्वस्थ प पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. पालखीचे हे दहावे वर्ष आहे.
प्रारंभी वृत्तछायाचित्रकार दत्तात्रय व सौ दिपाली गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून संत पुजन केले. याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक अरूणराव येवले, फकिरराव बोरनारे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, भिमा संवत्सरकर, सुदाम साबळे आदि उपस्थित होते. अरुण पगारे यांनी बहारदार साई भजनाचा कार्यक्रम सादर केला. शिवचरित्रकार सर्जेराव टेके महाराज यांनी शिवचरित्राविषयी माहिती दिली. श्रीकांत त्रिभुवन यांनी साईवेशभूषा सादर केली. श्री विठठल रुक्मीणी वारकरी भवनाचे सुदाम साबळे यांनी दिंडी मुक्कामाची व्यवस्था केली. याप्रसंगी सर्वश्री. सरपंच संतोष आरखडे (तरवडे), सरपंच सोमनाथ चव्हाण (जेऊर), सरपंच रमेश नलावडे (कानडगांव), सरपंच सुलोचना ढेपले (संवत्सर), दिलीप ढेपले, भगवान नलावडे, ज्ञानेश्वर नलावडे, ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे, राजेंद्र परजणे, किशोर परजणे, सोमनाथ परजणे, रमाकांत वाकचौर, मुकुंद काळे, गोरख टुपके, सुभाष बिडवे, धिरज देवतरसे, बापू गायकवाड, राजेंद्र नवाळे शंकर नेहे, अशोक वाळूज, रामनाथ आबरे सर, अंकुश गूडघे, शरद शिंदे, लक्ष्मण वर्पे, सुकदेव वरघुडे, अजय जोशी, लहु जोशी, पप्पू परजणे, नानासाहेब देवतरसे, मोहन सोनवणे, अमित गायकवाड, काका गायकवाड, विशाल शहाणे, अलिम तांबोळी, मन्सूर तांबोळी, जाकिर पठाण, सोमनाथ काळे, धनंजय काळे, चारू गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, भारत परमेश्वर, वसंत थोरात, मच्छिंद्र होन, भाऊसाहेब दवंगे, कमलाकर भालेराव, कैलास सूर्यवंशी, जीवन पावडे, श्रीराम भजनी मंडळ, शृंगेश्वर भजनी मंडळ, खंडोबा भजनी मंडळ यांच्यासह विविध संस्थाचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन लक्ष्मण साबळे यांनी केले., पावन हनुमान मंडळ व युवा कार्यकर्त्यांनी उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप केले. तालुक्यातील संवत्सर येथे कानडगांव येथील साई पालखी दिंडीचे शुक्रवारी आगमन झाले त्याचे विधीवत पुजन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख विश्वस्थ प. पू रमेशगिरी महाराज   यांच्या हस्ते करण्यात आले. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!