Thursday, April 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदारसंघाच्या नशिबी मिळाल्या आमदार काळेंच्या फक्त हवेतल्या घोषणा!!- साहेबराव रोहोम

मतदारसंघाच्या नशिबी मिळाल्या आमदार काळेंच्या फक्त हवेतल्या घोषणा!!- साहेबराव रोहोम

कोपरगाव प्रतिनिधी

           कोपरगाव मतदारसंघात माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या कामाची माहिती जनतेला आहे.विद्यमान आमदारांनी प्रसिद्धी माध्यमातून आभासी विकासाची चित्रफीत अर्थात फक्त कागदावरील घोषणाबाजी न करता सौ.कोल्हेताई यांनी प्रत्यक्षात दृष्टीला दिसतील अशी वैभवशाली विकासकामे मतदारसंघात उभारली आहेत,हे सुधाकर रोहोम यांना दिसणार नाही कारण त्यांच्या डोळ्यावर हवेतल्या घोषणांचा चष्मा आमदार काळे यांनी घातला आहे.आमदार काळे यांच्या या दोन अडीच वर्षात कोट्यवधीच्या फक्त घोषणा आणि सोशल मिडियावर जाहिराती व बातम्या झळकल्या मात्र प्रत्यक्षात छदामाचेही ठोस काम कुठेही झालेले नाही,असा शाब्दिक हल्ला भाजपा तालुकाध्यक्ष श्री.साहेबराव रोहोम यांनी सुधाकर रोहोम यांच्या टिकेवर चढवला आहे.
सौ.कोल्हे यांच्या कामाची उंची आपल्याला गाठता येणार नाही हे फक्त बातमीत असणाऱ्या आमदारांनी जाणले असावे त्यामुळे रोजच उठसुठ टीका करण्यासाठी त्यांना नवीन विषय काढावा लागतो व नवीन माणूस दरवेळी शोधावा लागतो.ज्यांच्या नेत्यांना स्वतःच्या प्रयत्नांनी निधी आणता येत नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांना नियमित येणाऱ्या निधीतून होणाऱ्या कामांचे आयते नारळ फोडून श्रेय घेण्याचा व कागदोपत्री बातम्या रंगवण्याचा प्रयत्न जे करतात अशांनी कोल्हे यांच्यावर टीका करणे म्हणजे आपल्याच हातून त्यांनी स्वतः आपला अपमान करून घेणे आहे.कोपरगाव बस स्थानक,पोलीस स्टेशन इमारत,वाचनालय इमारत,सार्वजनिक बाजार ओटे,गोकूळनगरी पूल,कोकमठान पाणी पुरवठा योजना,तालुका अंतर्गत रस्ते,वीज सबस्टेशन्स,नगरपालिका इमारत,पंचायत समिती इमारत या सर्व कामांसाठी कोट्यावधीचा निधी कोल्हे ताईंनी आणला व ती कामे दृश्य स्वरुपात आहेत.सुधाकर रोहोम यांनी आमदार काळेंच्या निधींबद्दल ज्या वल्गना केल्या तर त्यांच्या काळात अद्याप एकही ठोस काम झालेले जनतेला दिसत नाही.
एकीकडे गोदावरी कालव्यांसाठी शेकडो कोटींचा निधी मिळवला अशी पाठ आपण थोपटुन घेतली,पण ना कोणता निधी आला ना कोणते काम झाले त्यामुळे गोदावरी कालवा दोन दिवसांपूर्वी फुटला असून लाखो लिटर पाणी वाया गेले.शेतीला रोटेशन वेळेवर नाही,पिण्याच्या पाण्याच्या अनेक पाणीपुरवठा योजना कोल्हे ताईंच्या काळात अंतिम टप्प्यात आलेल्या होत्या त्यांचे आयते श्रेय लाटण्यासाठी खटाटोप सूरु आहे.ज्यांना स्वतःच्या प्रयत्नातून एकही काम करता येत नाही त्यांची खरी हतबलता आहे हे जनतेला दिसते आहे फक्त आमदार काळे यांच्या कार्यकर्त्यांना दिसत नाही हे रोहोम यांनी समजून मगच कोल्हे कुटूंबावर टीका करावी.
व्यक्तिगत टिका करण्याएवढे आपण महान कर्तृत्ववान नाहीत त्यामुळे पाट फेकून मारला तर तो बसायला टाकला या वाक्प्रचाराप्रमाणे गोंडस गैरसमजात सुधाकर रोहोम यांनी राहु नये असा सल्लाही शेवटी साहेबराव रोहोम यांनी त्यांना दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!