
कोपरगाव प्रतिनिधी
मागील पाच वर्षात विकासाचा खेळखंडोबा झाल्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने तुम्हाला नाकारले हे त्यांनी विसरू नये. ना. आशुतोष काळे यांनी दोनच वर्षात मतदार संघाच्या विकासाला दिलेली चालना यामुळे विरोधकांची पोटदुखी वाढली आहे. विकासाच्या बाबतीत बोलायला त्यांच्याकडे काहीच नाही त्यामुळे पाच वर्षातील अपयश झाकण्यासाठी विरोधक व्यक्तिगत पातळीवर टीका करीत असून यावरून विरोधकांची हतबलता दिसून येत असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी म्हटले आहे.
मतदार संघातील नागरिकांना विकास पाहिजे तो दुर्दैवाने मागील पाच वर्षात केंद्रात व राज्यात त्यांच्या पक्षाचे सरकार असतांना देखील होवू शकला नाही. याउलट फक्त राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना व आपल्या संयमी व्यक्तिमत्वाच्या जोरावर व विकासाच्या तळमळीतून केंद्रातील अनेक मंत्र्याच्या मदतीने दोनच वर्षात ना. आशुतोष काळे यांनी अनेक महत्वाचे विकासाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. यामध्ये गोदावरी कालव्यांची दुरुस्ती, कोपरगाव शहरातील ५ नंबर साठवण तलाव, उपजिल्हा रुग्णालय, न्यायालय इमारत, न्यायाधीशांचे निवास, अनेक पाणी पुरवठा योजना, आदी महत्वांच्या विकास कामांबरोबरच दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या कोपरगाव-सावळीविहीर रस्त्याचा प्रश्न देखील मार्गी लावला आहे. यासाठी मागील दोन वर्षात त्यांनी केलल्या प्रत्येक पाठपुराव्याची माहिती त्यांनी मतदार संघातील जनतेला वेळोवेळी दिली आहे हे वेड पांघरून पेडगावला जाणाऱ्या विरोधकांना देखील माहिती आहे. मात्र मतदार संघाचा होत असलेला विकास विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे.
विकास करायची मानसिकता आणि त्यासाठी सातत्याने करावा लागणारा पाठपुरावा जर करायची तयारी असेल तर मतदार संघाचा सर्वांगीण विकास सहजपणे होऊ शकतो. मात्र त्यासाठी पाठपुरावा देखील तेवढाच महत्वाचा असून तुमच्याकडे असलेली विकासाची तळमळ पाहून सार्वजनिक विकास कामांसाठी विरोधी पक्षाचे मंत्री देखील मदत करू शकतात हे कोपरगाव-सावळीविहीर रस्त्यासाठी मिळालेल्या १७८ कोटी रुपयांच्या निधीवरून दिसून येते हे ना. आशुतोष काळे यांनी आपल्या कृतीतून दोन वर्षात दाखवून दिले आहे. मतदार संघाला विकासाच्या वाटेवर घेवून येण्यात ना. आशुतोष काळे यशस्वी झाले असून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मतदार संघासाठी त्यांनी आजवर कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. ना. आशुतोष काळे यांनी जीवघेण्या कोरोना महामारीत नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवून विकासाची महत्वाची कामे मार्गी लावून दाखविली. तेच काम आपल्याला सर्व परिस्थिती अनुकूल असतांना देखील मागील पाच वर्षात जमले नाही याचे शल्य विरोधकांना बोचत आहे. त्यामुळे आपले मागील पाच वर्षाचे अपयश कुठतरी झाकले जावे या उद्देशातून विरोधक व्यक्तिगत पातळीवर टीका करीत असून यावरून विरोधक किती हतबल झाले आहेत हे सिद्ध होत असल्याचे सुधाकर रोहोम यांनी म्हटले आहे.


