
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगांव राहाता तालुक्यासह शेतक-यांच्या शेती पाण्यांची सोय गोदावरी कालव्यामार्फत होत आहे, पण ते ब्रिटीशकालीन असून त्याचे ११७ वर्षे आर्यूमान झाल्याने खिळखिळे झाले आहेत त्याच्या नुतणीकरणासाठी सध्या वेळकाढूपणा सुरू आहे परिणामी त्याचे दुरगामी परिणामी येथील शेती सिंचन, पिण्यांचे पाण्यांवर होत असुन बारमाही लाभार्थी शेतकरी गोदावरी कालवे फुटीला वैतागले आहेत त्यामुळे रब्बी व उन्हाळ हंगाम धोक्यात आला आहे तेंव्हा निकडीची बाब म्हणून याकडे तातडीने लक्ष घालुन कालवे नुतणीकरणांची कामे तातडीने करण्यांत यावी अशी मागणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभाग व नाशिक पाटबंधारे विभाग यांच्याकडे केली आहे. ही कामे वेळेत झाली नाही तर शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल असेही ते म्हणाले.ते म्हणाले की, गोदावरी उजव्या आणि डाव्या कालव्याच्या नुतणीकरणासाठी मातीकामे, पुल, जल झंपी, कमान मो-या, जलसेतु, रेल्वे कॉर्सीग, सायफन, अतिवाहक, काट विमोचक, विमोचक अशी ३६४ कामे असुन त्यापैकी १२५ ते १५० कामे झाली आहेत उर्वरित कामांमुळे गोदावरी कालव्यांचे पाटपाण्यांचे आवर्तनास खो बसत आहे. सध्या गोदावरी डावा कालवा नांदुर मध्यमेश्वर जवळील ७ किलोमिटर अंतरावरील म्हसोबा वस्तीजवळ मोरीचा स्लॅब अचानक कोसळुन ६ फेब्रुवारी रोजी रात्री फुटला त्यातुन हजारो क्युसेक्स पाणी वाया गेले. हा कालवा तातडीने दुरुस्त करून रब्बी आर्वतन तात्काळ सुरळीत करावे. या कालव्याची सर्व कामे ब्रिटीशकालीन असुन त्याचे आर्युमान ११७ वर्षांचे झाले आहे. माजीमंत्री शंकरराव कोल्हे व तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शासनाकडे गोदावरी कालवे नुतणीकरण कामाचा मोठा पाठपुरावा करून त्यातील काही कामे पूर्ण करण्यासाठी तातडीचा निधी मिळवला, काही कामे निवादास्तरापर्यंत आणून ठेवली होती. सध्या गोदावरी उजव्या कालव्यांची १८ कोटी रूपये खर्चाची १६ कामांची तर डाव्या कालव्यांची १७ कामांची १८ कोटी रूपये खर्चाची निवीदा प्रक्रिया सुरू आहे, त्यास किमान चार महिन्यांचा अवधी लागणार आहे. कालवे वारंवार फुटू लागल्याने सल्लागार समिती व नाशिक पाटबंधारे खात्याने ठरविलेल्या रब्बी व उन्हाळ आवर्तनाच्या तारखा विस्कळीत होवुन त्याचे दुरगामी परिणामी हजारो हेक्टर शेती पिकांवर व फळबागांवर होणार नाही त्यामुळे शेतक-यांचे शेतीचे गणित बिघडुन पिकाची कोटयावधी रूपयांची नासाडी होणार आहे. गोदावरी कालवे नुतणीकरणाचा सुधारीत प्रशासकीय मंजुरीचा प्रस्ताव पुन्हा नव्याने तयार करावा लागणार आहे, यात मोठा अवधी खर्ची पडुन पुन्हा निधी मागणीसाठी काही वर्षांचा वेळ लागेल, त्यामुळे या कालव्यांची नुतणीकरणांची कामे रखडली जाणार आहे. असाच वेळकाढूपणा होत राहिला तर गोदावरी कालव्यावरील शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना व औद्योगिकीकरण धोक्यात येणार आहे तेव्हा यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालकांनी तात्काळ बैठक घेवुन कामाचे नियोजन करावे व पुढील सुप्रमा तातडीने करण्याबाबत जलसंपदा खात्याच्या अधिका-यांना सुचना द्याव्या अन्यथा यासाठी शेतक-यांचा मोठा संघर्ष तयार होईल असेही विवेक कोल्हे शेवटी म्हणाले.


