
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगावतालुक्यात जेऊर कुभांरी येथील रहिवासी मोहनराव चव्हाण यांना आज दिनांक १.११.२०२१ रोजी जेऊर कुभांरी वैकुंठधाम येथे शोकाकुल वातारवरणात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या जाण्याने जेऊर कुभांरी गावात शोकाकळा पसरली. मोहनराव चव्हाण अध्यात्मिक विचारांचे होते, त्यांच्या जाण्याने धार्मिक, राजकीय, व सामाजिक शैक्षणिक, क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. मोहनराव चव्हाण स्वतः प्रवचनकार होते ते आपल्या प्रवचनाने जनसमुदायाला मंत्रमुग्ध करून टाकत असत . जेऊर कुंभारी गावात हरिनाम सप्ताहात प्रवचन करून जनसमुदाय आपलस करत असत.
महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यात मोहनराव चव्हाण यांनी ३८ वर्ष सेवा दिली. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांचे परमशिष्य होते.राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यास त्यांचा सिंहाचा वाटा होता.

जेऊर कुंभारी विकास ,सामाजिक,धार्मिक कार्यात नेहमी सहभाग असायचा धार्मिकते बरोबर शिक्षणाची ओढ होती. ती समाजमनात रुजावी म्हणुन त्यांनी महर्षी स्कूलची स्थापना केली. यात सीबीएसई पॅटर्न चालू करण्यात आली. मोहनराव चव्हाण स्वतः विद्यार्थ्यांची चौकशी करत असत,तसेच विद्यार्थीच्या समस्या जानून घेत असत.म्हणुनच त्यांना शिक्षण प्रेमी म्हणून संबोधले जायचे आज त्यांच्या अचानक सर्व पंचक्रोशीतील आपल्या चाहत्यांना सोडुन जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

परम पु. रमेशगिरी महाराज, भाऊराव पाटील,
महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बीपीनदादा,मा.आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष विजय वाहडणे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, कोल्हे कारखान्याचे माजी संचालक मधुकर वक्ते, उपसरपंच जालिंदर चव्हाण, जनार्दन स्वामी आश्रमातील संत मंडळी, औरंगाबाद, नाशिक त्रंबकेश्वर येथील संतगण,भक्तगण, व पंक्रोशीतील सर्व चाहत्यांनी आश्रुनयनांनी श्रध्दांजली अर्पण केली.
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी ट्रस्टचे जन संपर्क अधिकारी सुबेदार शांतीलाल होन यांनी अंत्यविधीचे सर्व सूत्र संचालन केले.



