
कोपरगाव प्रतिनिधी
गोदावरी कालव्यातून कोपरगाव शहराला देण्यात येणाऱ्या पाण्याची पट्टी व्यावसायिक दराने न आकारता हि पाणी पट्टी घरगुती दराने आकारण्यात यावी यासाठी पाटबंधारे अधिकाऱ्यांसमवेत घेण्यात आलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही साठवण तलावांना पाटबंधारे विभाग गोदावरीच्या डाव्या कालव्यातून पाणी देण्यात येते. या देण्यात येणाऱ्या पाण्याची पाणीपट्टी वर्षानुवर्षापासून व्यावसायिक दराने आकारली जात आहे. त्यामुळे कोपरगाव नगरपालिकेवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. लवकरच या चार साठवण तलावाच्या जोडीला पाच नंबर साठवण तलावाची भर पडणार आहे. त्यामुळे कोपरगाव नगरपालिकेवर अधिक बोजा पडू नये यासाठी आकारण्यात येणारी पाणी पट्टी घरगुती दराने आकारली जावी यासाठी नासिक येथे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पाटबंधारे अधिकारी व कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.या बैठकीत पाणी पट्टी घरगुती दराने आकारण्याबाबत सकारत्मक चर्चा झाली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
या बैठकीसाठी गोदावरी कालवे अधीक्षक अभियंता श्रीमती अलका आहेरराव,कार्यकारी अभियंता सागर शिंदे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पाटील, गोदावरी डावा कालवा उपअभियंता थोरात आदी उपस्थित होते.पाणी पट्टी घरगुती दराने आकारण्याबाबत पाटबंधारे अधिकाऱ्यांसमवेत घेण्यात आलेल्या बैठकीत चर्चा करतांना आ. आशुतोष काळे


