
कोपरगाव प्रतिनिधी
आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात ‘आषाढी वारी व साक्षरता दिंडी’ उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. टाळ-मृदुंगाचा गजर, “ज्ञानबा-तुकाराम”च्या जयघोषाने परिसर विठ्ठलमय झाला होता.
विद्यालयातून निघालेली दिंडी श्रीराममंदिर मार्गे कोपरगाव पंचायत समितीपर्यंत काढण्यात आली. वारकरी वेशभूषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि विठ्ठल-रखुमाईचे रूप धारण केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दिंडीतून भक्तीबरोबरच साक्षरतेचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला. साक्षरता फलकाचे आकर्षक लेखन श्री. अतुल कोताडे यांनी केले.यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. चंद्रकांत ठोळे, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. कैलास ठोळे, सचिव श्री. दिलीप अजमेरे, सहसचिव श्री. सचिन अजमेरे, खजिनदार श्री. आनंद ठोळे, सदस्य डॉ. अमोल अजमेरे, श्री. राजेश ठोळे, श्री. संदीपअजमेरे, दीलीप तुपसैंदर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून दिंडीचे स्वागत केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.मुख्याध्यापक श्री. सुरेंद्र शिरसाळे, पर्यवेक्षक श्री. बलभीम उल्हारे यांच्यासह श्री. संजय बर्डे, सौ. शितल अजमेरे, सौ. संजीवनी डरांगे, सौ. रूपाली साळुंखे, श्रीमती स्वाती जाधव, सौ. पल्लवी तुपसैंदर, सौ. छाया निंबाळकर, श्री. योगेश गवळे, श्री. दिगंबर देसाई, श्री. सचिन डोळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्स्फूर्त सहभागामुळे या आषाढी वारीने कोपरगावकरांची मने जिंकली.


