Saturday, June 20, 2026
Google search engine
HomeUncategorized​पुष्पगुच्छ नको, शैक्षणिक साहित्याची मदत’; बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक उपक्रमांचा वर्षाव!!

​पुष्पगुच्छ नको, शैक्षणिक साहित्याची मदत’; बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक उपक्रमांचा वर्षाव!!

​कोपरगाव प्रतिनिधी

संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि लोकनेते मा. बिपिनदादा कोल्हे यांचा वाढदिवस म्हणजे कोपरगाव परिसरातील कार्यकर्त्यांसाठी समाजसेवेचा एक मोठा उत्सव असतो. आपल्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून तो समाजाच्या उपयोगाला कसा येईल, याचे उत्तम उदाहरण बिपिनदादा कोल्हे नेहमीच घालून देतात. दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ, शाल किंवा हार-फुले न स्वीकारता, त्याऐवजी गोरगरिबांच्या शिक्षणासाठी मदत करा किंवा शैक्षणिक उपक्रम राबवा, असे आवाहन बिपिनदादा कार्यकर्त्यांना करत असतात.त्यांनी यावर्षीही स्वतःहून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार वह्या पाठवून दिल्या आहेत. या प्रेरणादायी उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील शाळेत वह्या वाटपाचा दिमाखदार कार्यक्रम उत्साहात पार पडला.
​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदास रणशूर होते, तर कोपरगावचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी बिपिनदादा कोल्हे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, बिपिनदादांच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात गोरगरीब युवकांना दर्जेदार व्यावसायिक शिक्षणाची सोय उपलब्ध होत आहे आणि त्या माध्यमातून त्यांना देश-परदेशात रोजगाराच्या संधी मिळत आहेत. बिपिनदादा कोल्हे साहेबांचा वाढदिवस अशा विधायक पद्धतीने स्वतःच्या गावात साजरा करताना विशेष आनंद होत असल्याचे सांगत त्यांनी दादांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सरपंच दीपक चौधरी यांनी आपल्या मनोगतात कोल्हे साहेबांचा विकासाचा व समाजसेवेचा वारसा बिपिनदादा अगदी समर्थपणे पुढे चालवत असल्याचे नमूद केले. कोविड काळातील त्यांचे समाजशील उपक्रम आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना स्वावलंबी बनवण्याचे त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे, असेही सरपंच म्हणाले. यावेळी रमाकांत वाकचौरे यांनी समाजाची बांधिलकी जपताना बिपिनदादांनी गोरगरिबांच्या शिक्षण आणि रोजगारासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांवर प्रकाश टाकला.
​या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दगू पाटील चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष द्वारकानाथ वहाडणे, सरपंच दीपक चौधरी, उपसरपंच संतोष चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सुरज रणशूर, ग्रामपंचायत सदस्य संदिप थोरात, रमाकांत वाकचौरे, रामदास रणशूर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश रणशूर, आरोग्य अधिकारी विशाल तनपुरे, नानासाहेब चौधरी, राहुल रणशूर, शिक्षिका वैशाली सोनवणे, अंगणवाडी सेविका वनिता चौधरी, तसेच मोठ्या संख्येने पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांनी केले, तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश रणशूर यांनी उपस्थितांचे आभार मानले. शाळेच्या वतीने बिपिनदादा कोल्हे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक व आभार मानण्यात आले. पुष्पगुच्छाऐवजी वह्यांच्या रूपाने मिळालेली ही मदत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणारी ठरली असून, समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!