Thursday, June 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedएका महिन्यात तळ्यातील पाणी संपले कसे?नगरसेवक वाल्मिक लाहीरेंच्या प्रश्नावर सभापती वाजे निरुत्तर

एका महिन्यात तळ्यातील पाणी संपले कसे?नगरसेवक वाल्मिक लाहीरेंच्या प्रश्नावर सभापती वाजे निरुत्तर

कोपरगाव प्रतिनिधी

मागील आवर्तनात १५ मे रोजी शहराला पाणी पुरवठा करणारे पाचही तळे पूर्ण क्षमतेने भरण्यात येवूनही काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष म्हणतात की, पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावांनी तळ गाठला असून साठवण तलावात पाणी शिल्लक नाही.आवर्तन आल्याशिवाय पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही. तर अवघ्या एका महिन्यात या पाचही तळ्यांनी तळ कसा गाठला?एका महिन्यात पाणी संपले कसे? पाणी नागरीकांना मिळत नव्हते तर ते पाणी नेमके गेले कुठे? अशा प्रश्नांची सरबत्ती राष्ट्रवादीचे नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी पाणी पुरवठा समितीच्या बैठकीत केली असता पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षा सौ.वैशाली वाजे यांच्याकडे कोणतीही ठोस माहिती नसल्यामुळे त्यांच्यावर निरुत्तर होण्याची नामुष्की ओढावली. कोपरगाव नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा समितीची बैठक गुरुवार (दि.१८) रोजी पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षा सौ.वैशाली वाजे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून या बैठकीत पाणी पुरवठा समितीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य वाल्मिक लाहीरे यांनी पाणी पुरवठ्या बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. ऐन उन्हाळ्यात कोपरगावकरांना पिण्याच्या पाण्याची अडचण होवू नये यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देवून गोदावरी कालव्यांना पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या सूचना दिल्यामुळे गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्यात आले असून शहराला पाणी पुरवठा करणारे पाचही तळे पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात आली आहेत.मात्र मागील महिन्यातही १५ मे रोजी पाणी पुरवठा करणारे १ ते ५ साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेतली असतांना देखील एकाच महिन्यात सर्व साठवण तलाव कसे काय रिकामे झाले? हे पाणी जाते कुठे हे न सुटणारे कोडे आहे. त्यामुळे यापुढील काळात कोपरगावकरांना पाणी टंचाई जाणवू नये यासाठी पाण्याचा वापर जपून करावा. कोपरगाव शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरू असून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.त्यामुळे ही पाणी गळती तातडीने बंद करावी. तसेच पाणी पुरवठा विभागात रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत त्यांची न्यायालयीन लढाई सुरु असून त्याबाबत कोपरगाव नगरपरिषदेने सहानुभूतीने विचार करून त्यांना कायमस्वरूपी कोपरगाव नगरपरिषदे सेवेत सामावून घ्यावे. अशा सूचना राष्ट्रवादीचे पाणी पुरवठा समितीकचे सदस्य नगरसेवक वाल्मिक लहिरे व नगरसेविका सौ.स्मिता साबळे यांनी पाणी पुरवठा समितीच्या बैठकीत केल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!