
कोपरगाव प्रतिनिधी
फेब्रुवारी 2026 मध्ये (सीबीएसई) मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यामध्ये श्री चैतन्य टेक्नो स्कूल, कोपरगाव शाखेने 100% निकालाची दैदिप्यमान कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशाने संस्थेची गुणवत्ता, शिस्त आणि उत्कृष्टतेची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
संपूर्ण भारतभर 950 पेक्षा अधिक शाखांचे विस्तृत जाळे असलेल्या श्री चैतन्य टेकनो स्कूल ची कोपरगाव शाखा मागील वर्षी रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून कार्यान्वित झाली.आणि अत्यंत अल्प कालावधीतच या शाखेने आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
शाळेच्या प्राचार्या विद्या विश्वनाथन, डीन सागर पाटील, इन्चार्ज दीपक वक्ते तसेच समर्पित शिक्षकवृंद यांच्या कुशल मार्गदर्शन, अचूक नियोजन आणि अथक परिश्रमामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. पदार्पणातच घेतलेली ही अभूतपूर्व झेप म्हणजे “श्री चैतन्य” या नावाच्या गुणवत्तेची साक्ष आहे.
या दैदिप्यमान यशामध्ये, पहिल्याच वर्षी प्रथम क्रमांकाचा मान पटकावत देवराज भगवान देशमुख या विद्यार्थ्याने 98.2 % गुण मिळवत आपल्या उज्ज्वल कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला.
90% पेक्षा अधिक गुण मिळवणारे मानकरी विद्यार्थी:
1) देवराज भगवान देशमुख – 98.2%
2) वैष्णवी नानासाहेब गव्हाणे – 97.2%
3) पृथ्वीराज गणेश सोळुंके – 95%
4) नैतिक निलेश निकुंभ – 93.6%
5) समर्थ दिगंबर धोर्डे – 91.6%
6) स्वरा उदय पाटील – 91.4%
7) साईश विनोद थोरात – 90.6
तसेच, 80% पेक्षा अधिक गुण मिळवून 8 विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा शाळेच्या व्यवस्थापनातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. मा. प्राचार्या, झोनल डीन, बीडीएम, इन्चार्ज, कोऑर्डिनेटर व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी पालकांनी आपले मनोगत व्यक्त करताना भावना अनावर झाल्या आणि आनंदाश्रूंनी वातावरण भारावून गेले. सर्व पालकांनी शाळेच्या प्राचार्या व शिक्षकवृंदांचे मनापासून आभार मानले.
पालकांना संबोधित करताना प्राचार्या मॅडम म्हणाल्या,
आपल्या मुलांच्या यशामागे केवळ शाळेचा नव्हे, तर तुमच्या विश्वासाचा आणि सहकार्याचाही मोठा वाटा आहे. शिक्षण म्हणजे फक्त गुण मिळवणे नाही, तर चांगले व्यक्तिमत्त्व घडवणे आहे. आम्ही विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेसाठी नव्हे, तर जीवनासाठी तयार करत आहोत.
आपण आमच्यावर ठेवलेला विश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. पुढील काळातही आपण सर्वांनी एकत्रितपणे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करूया.
तसेच, यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, सागर पाटील म्हणाले,
आपण आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही यशामध्ये रूपांतरित केला, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.
श्री चैतन्य कोपरगाव शाखेच्या या पहिल्या वहिल्या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेच्या संचालिका मा. सिमा बोपन्ना आणि एजीएम गणेश गुप्ता यांनी मनःपूर्वक कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


